Team india: गौतम गंभीर बनणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक?

  45

मुंबई: गौतम गंभीरने(gautam gambhir) टीम इंडियासाठी जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. तो वर्ल्डकप विजेत्या संघाचा भागही होता. गंभीर एक मेन्टॉर म्हणूनही हिट ठरला आहे. तो आयपीएल २०२४मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता आणि संघाने खिताब जिंकला. टीम इंडिया सध्या नव्या प्रशिक्षकपदाचा शोधात आहे. एका रिपोर्टनुसार गंभीरला टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. याबाबत बीसीसीआयमध्ये बातचीत सुरू आहे.


एका रिपोर्टनुसार एका आयपीएल फ्रेंचायजीच्या ऑनरने याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितले ही गौतम गंभीरला पुन्हा प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. याबाबत बीसीसीआयची त्याच्यासोबत मीटिंगही झाली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत टीम इंडियाच्या हेडकोचबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



गंभीरच्या उपस्थितीत केकेआर बनली चॅम्पियन


गंभीर केकेआरच्या आधी लखनऊ सुपर जायंट्सटा मेन्टॉर होता. त्याच्या उपस्थितीत संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याने मेन्टॉरशिप सोडताच कामगिरी घसरली. लखनऊचा संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नाही. तर दुसरीकडे केकआरने खिताब जिंकला. केकेआर आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता.



दमदार होते आंतरराष्ट्रीय करिअर


गौतम गंभीरचे आंतरराष्ट्रीय करिअर दमदार राहिले. तो टीम इंडियासाठी १४७ वनडे सामने खेळला. यात त्याने ५२३८ धावा केल्या. गंभीरने वनडेत ११ शतके आणि ३४ अर्धशतके लगावली. त्याने ५८ कसोटीत ४१५४ धावा केल्या. या दरम्यान ९ शतके आणि २२ अर्धशतके ठोकली. तसेच दुहेरी शतकही ठोकले. गंभीर भारतासाठी ३७ टी-२० सामने खेळला. यात ९३२ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार