Mumbai Weather : उकाड्यापासून मुंबईकरांची होणार सुटका! ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज

'या' राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं (Heat) प्रमाण वाढल्याचं दिसून येतं होतं. काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना गारवा मिळत असला तरीही मुंबईकरांना बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. कालपासून मुंबईतील ढगाळ वातावरणामुळे लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता अशातच पुढील आणखी काही हा दिलासा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Weather Update)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरांमध्ये पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा (Rain) अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना अलीकडच्या आठवड्यात उच्च तापमानापासून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत १०-११ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.



या भागात उष्णतेचा रेड अलर्ट


देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना अशातच देशातील १७ ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.


दरम्यान, यंदा वेळेच्या आधीच मान्सून (Monsoon) अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय तो वेगाने पुढे सरकत असून लवकरच नागरिकांना मान्सूनचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व