Mumbai Weather : उकाड्यापासून मुंबईकरांची होणार सुटका! ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज

'या' राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं (Heat) प्रमाण वाढल्याचं दिसून येतं होतं. काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना गारवा मिळत असला तरीही मुंबईकरांना बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. कालपासून मुंबईतील ढगाळ वातावरणामुळे लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता अशातच पुढील आणखी काही हा दिलासा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Weather Update)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरांमध्ये पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा (Rain) अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना अलीकडच्या आठवड्यात उच्च तापमानापासून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत १०-११ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.



या भागात उष्णतेचा रेड अलर्ट


देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना अशातच देशातील १७ ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.


दरम्यान, यंदा वेळेच्या आधीच मान्सून (Monsoon) अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय तो वेगाने पुढे सरकत असून लवकरच नागरिकांना मान्सूनचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा