Mumbai Weather : उकाड्यापासून मुंबईकरांची होणार सुटका! ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज

  151

'या' राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं (Heat) प्रमाण वाढल्याचं दिसून येतं होतं. काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना गारवा मिळत असला तरीही मुंबईकरांना बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. कालपासून मुंबईतील ढगाळ वातावरणामुळे लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता अशातच पुढील आणखी काही हा दिलासा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Weather Update)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरांमध्ये पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा (Rain) अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना अलीकडच्या आठवड्यात उच्च तापमानापासून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत १०-११ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.



या भागात उष्णतेचा रेड अलर्ट


देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना अशातच देशातील १७ ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.


दरम्यान, यंदा वेळेच्या आधीच मान्सून (Monsoon) अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय तो वेगाने पुढे सरकत असून लवकरच नागरिकांना मान्सूनचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या