Konkan Railway : चाकरमान्यांचा खोळंबा! कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार

'या' दिवशी असणार मेगाब्लॉक


मुंबई : उन्हाळी सुट्ट्या (Summer Vacation) संपत आल्यामुळे गावी गेलेले अनेक चाकरमानी आता परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. अशातच कोकणातून (Kokan) परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून सीएसएमटी (CSMT) येथे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या अवेळी धावत आहेत. त्याचबरोबर कोकण रेल्वेवर देखील रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



असं असेल रेल्वेचं वेळापत्रक


कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान ८० मिनिटे थांबा घेईल. तसेच गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान ४० मिनिटे थांबा घेईल. तर गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीदरम्यान २० मिनिटांचा थांबा घेईल.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे