Konkan Railway : चाकरमान्यांचा खोळंबा! कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार

'या' दिवशी असणार मेगाब्लॉक


मुंबई : उन्हाळी सुट्ट्या (Summer Vacation) संपत आल्यामुळे गावी गेलेले अनेक चाकरमानी आता परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. अशातच कोकणातून (Kokan) परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून सीएसएमटी (CSMT) येथे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या अवेळी धावत आहेत. त्याचबरोबर कोकण रेल्वेवर देखील रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



असं असेल रेल्वेचं वेळापत्रक


कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान ८० मिनिटे थांबा घेईल. तसेच गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान ४० मिनिटे थांबा घेईल. तर गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीदरम्यान २० मिनिटांचा थांबा घेईल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु