Konkan Railway : चाकरमान्यांचा खोळंबा! कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार

  128

'या' दिवशी असणार मेगाब्लॉक


मुंबई : उन्हाळी सुट्ट्या (Summer Vacation) संपत आल्यामुळे गावी गेलेले अनेक चाकरमानी आता परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. अशातच कोकणातून (Kokan) परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून सीएसएमटी (CSMT) येथे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या अवेळी धावत आहेत. त्याचबरोबर कोकण रेल्वेवर देखील रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



असं असेल रेल्वेचं वेळापत्रक


कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान ८० मिनिटे थांबा घेईल. तसेच गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान ४० मिनिटे थांबा घेईल. तर गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीदरम्यान २० मिनिटांचा थांबा घेईल.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या