CM Eknath Shinde : मान्सून दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?


मुंबई : सध्या मुंबईत अधूनमधून ढगाळ वातावरण होत असून लवकरच मान्सून (Monsoon) सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईची दरवर्षीप्रमाणे तुंबई होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. पावसात मुंबई व इतर राज्यांत देखील अनेक दुर्घटना घडत असतात. भूस्खलन, दरड कोसळणे, पूर येणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पडणे यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांची आढावा बैठक घेऊन उपाययोजनांसंदर्भात आदेश दिले.


बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, इतर राज्याशी संपर्क करण्याची बाब यावरही चर्चा करण्यात आली. लोकांना संकटाबाबत जागृत करण्याचा प्रयत्न कसा करता येईल, धोकादायक इमारतीतील लोकांचे स्थलांतरण कसे करता येईल, याचा आढावा घेतला. याशिवाय दुष्काळाबाबत चर्चा झाली असून मदत व पंचनामा यावर सखोल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून NDRF, SDRF सह महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भूस्खलनासारख्या घटना कशा टाळता येतील, याचाही आढावा घेतला. 'झिरो कॅज्युअल्टी मिशन' नुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल


मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, जनतेला त्रास होऊ नये, जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन कसे करता येईल, तसेच तुकड्या वाढवण्यासाठीही चर्चा झाली. यासोबतच यंत्रणा सज्ज आहेत, बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी


मुंबईत काही महिन्यांपूर्वी कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलं होतं. परंतु कोस्टल रोडच्या बोगद्यांच्या भिंतींना गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी केली आणि दुरुस्तीबाबत सूचना केल्या आहेत.

Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली