Arvind Kejriwal : केजरीवालांना धक्का! अंतरिम जामीनाच्या मुदतवाढीबाबत दिलासा नाही

सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाचा नकार


नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्या प्रकरणी ते दीड महिना तुरुंगात होते. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पूर्वतयारीसाठी त्यांना १० जून ते १ मे पर्यंतचा अंतरिम जामीन (Interim bail) मंजूर करण्यात आला होता. मात्र, वैद्यकीय चाचणीकरता १ मे नंतर अंतरिम जामीनात ७ दिवसांची मुदतवाढ करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज केजरीवालांनी दाखल केला होता. या प्रकरणी तातडीने दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला आहे.


अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन ७ दिवसांनी वाढवून मिळावा यासाठी अर्ज केला होता. केजरीवालांचा अर्ज ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर मांडला. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली असून या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्ज मुदतवाढीचं प्रकरण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढं योग्य निर्णयासाठी मांडावं, असं खंडपीठाने म्हटलं आहे.



अंतरिम जामीनाची मुदत १ जूनपर्यंतच


अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यांना २१ मार्चला अटक करण्यात आली होती. अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात अटकेच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १० मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. या जामीनाची मुदत १ जून रोजी संपणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी २ जून रोजी आत्मसमर्पण करावं असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता.


दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचं अटकेच्या कारवाईनंतर ७ किलोनं वजन घटलं तर कीटोन लेवल देखील वाढलेली आहे. ही गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. काही डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे. PET-CT स्कॅन आणि काही टेस्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे सात दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केजरीवालांना तातडीने दिलासा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.


Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना