Remal Cyclone : रेमल चक्रीवादळाचा जोरदार फटका! झाडे पडली, पत्रे उडाले आणि...

पंतप्रधान मोदी यांनीही घेतला परिस्थितीचा आढावा


मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ (Cyclone Remal) आज पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग १०० ते ११० किमी असल्यामुळे या चक्रीवादळाचा जोरदार फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला बसला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जवळील भागातील अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनीही चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं. चक्रीवादळामुळे पावसाच्या सरी कोसळल्या असून अनेक भागात झाडंही कोसळली आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागातील सुमारे १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.



नेमकं काय घडलं?


रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री ८.३० वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे वादळ किनारपट्टीपासून ३० किमी दूर होते. मात्र, हळूहळू ते जवळ आले आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. रेमल वादळामुळे लाकडाची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडेही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिघा येथील किनारपट्टीवर उंच लाटा उसळताना दिसत आहेत. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे.



बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी


बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर एवढा वाढला की, किनाऱ्यालगत उभ्या असलेल्या बोटी पाण्याने भरल्या. मातीची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. किनाऱ्यालगतचे शेत आणि सखल भाग जलमय झाला आहे. घरांची छतं उडाली, विजेचे खांब तुटले आणि अनेक भागात झाडे उन्मळून पडली. कोलकात्याला लागून असलेल्या सखल भागातील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.



'या' जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा


भारतीय हवामान विभागाचे सोमनाथ दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ धडकल्यामुळे दक्षिण बंगालमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव दिसून येईल. हवामान विभागाने चिरांग, गोलपारा, बक्सा, दिमा हासाओ, कचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर धुबरी, दक्षिण सलमारा, बोंगाईगाव, बजाली, तामुलपूर, बारपेटा, नलबारी, मोरीगाव, नागाव, होजई आणि पश्चिम कार्बी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण