Pune Police : हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून झाडाझडती!

  77

१३१ ठिकाणी धाडी टाकून ४३ बारवर कारवाई


मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता राज्यातील पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहेत. या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी विशेष लक्ष दिले असून पुण्यात उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाने अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती सुरू केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी दोन दिवसांत पोलिस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने १३१ ठिकाणी धाडी टाकून ४३ बारवर कारवाई केली.


या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २१ वर्षांखालील तरुणांना दारू विकल्याप्रकरणी दोन कारवाया, टेरेस रूफटॉपमध्ये अवैध दारू पुरवठा केल्याप्रकरणी तीन कारवाया आणि उशिरापर्यंत महिला वेट्रेसद्वारे दारूसेवा पुरविणाऱ्या तीन ठिकाणांसह अन्य कारवाया करण्यात आल्या आहेत.


तर शहरात करण्यात आलेल्या २३ कारवाया उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरीत्या राबविण्यात आल्या. या विशेष तपासणी मोहिमेत एकूण २३ बारवर विविध स्वरूपाचे नियमभंग केल्याप्रकरणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये २१ वर्षाखालील व्यक्तींना मद्यविक्रीच्या २ कारवाया, विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री व परवाना कक्षाबाहेर मद्यविक्रीच्या ११ कारवाया, तर ऑर्केस्ट्रा बारमध्ये उशिरा महिला नोकर काम करताना आढळल्याने १० लेडीज बारवर कारवाई करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या