Parcel Scam : पार्सल फसवणुकीचा वाढता धोका! 'असा' करा बचाव

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय


मुंबई : वाढत्या डिजीटल वातावरणात ऑनलाईन सेवा आवश्यक झाल्या आहेत. मात्र या डिजीटलायझेशनमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये अलीकडच्या काळात अधिकच प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आणखी एका फसवणुकीची भर पडली आहे, ती म्हणजे 'पार्सल स्कॅम'. गेल्या काही महिन्यांत या पार्सल स्कॅमबाबत लाखो लोकांची फसवणूक झाली असल्याची माहिती उघडकीस येत आहे. या प्रकरणाविरुद्ध सरकार कठोर कारवाई करण्यास सज्ज झाले असून महत्त्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



काय आहे पार्सल घोटाळा?


फसवणूक करणारे सोशल मीडियाद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात आणि नंतर बनावट कॉल करून तुमची फसवणूक करतात. या बनावट कॉलमध्ये ते तुम्हाला एखाद्या गुन्हेगारी संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगतात. तुमच्या नावावर अवैध वस्तू असलेले पार्सल असल्याचे सांगून ते तुमच्याकडून पैशांची मागणी करतात. तर कधी तुमच्या एखाद्या नातेवाईकांना अटक केल्याचे बनावट कॉलही करतात.



अशी बाळगा सावधगिरी



  • कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून फोन आला तर त्याची ओळख पटवून घ्या. तात्काळ पैशांची किंवा संवेदनशील माहिती देण्याची मागणी करणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नका.

  • संशयास्पद कॉल, संदेश किंवा संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींची माहिती cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या.

  • फोनवर कधीही तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. फोन करणाऱ्याची ओळख पूर्णपणे खात्री झाल्याशिवाय माहिती देऊ नका.

  • सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना आणि फसवणुकीपासून वाचण्याच्या उपायांची माहिती घेतली पाहिजे.


सरकारच्या या कठोर कारवाईमुळे आणि तुमच्या सतर्कतेमुळे ऑनलाइन फसवणूक रोखणे शक्य आहे.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती