Ajit Pawar : अजित पवार असला तरी कारवाई करा!

पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांचा खुलासा


पुणे : ''हो, मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. पण अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो,'' असा पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुलासा केला आहे.


पुण्यातल्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता, याचा खुलासा सीपींनी करावा आणि अजित पवार यांचा फोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा, अशी मागणीही दमानिया यांनी केली होती.





त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी कधीच कुणाला सोडण्यासाठी फोन केला नाही, असे अजित पवार म्हणाले.


अजित पवार म्हणाले की, पुण्यातील अपघात प्रकरणात डॉक्टर, पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे बेजबाबदारपणाचे कृत्य होते. नातू, वडील, आजोबांवर ‌कारवाई केली.. जो दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो.


ते पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणात कुणाचाही दबाव नाही. सुनील टिंगरे ‌यांचे नाव घेतले जात होते, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. चौकशीअंती 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये