Ajit Pawar : अजित पवार असला तरी कारवाई करा!

पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांचा खुलासा


पुणे : ''हो, मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. पण अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो,'' असा पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुलासा केला आहे.


पुण्यातल्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता, याचा खुलासा सीपींनी करावा आणि अजित पवार यांचा फोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा, अशी मागणीही दमानिया यांनी केली होती.





त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी कधीच कुणाला सोडण्यासाठी फोन केला नाही, असे अजित पवार म्हणाले.


अजित पवार म्हणाले की, पुण्यातील अपघात प्रकरणात डॉक्टर, पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे बेजबाबदारपणाचे कृत्य होते. नातू, वडील, आजोबांवर ‌कारवाई केली.. जो दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो.


ते पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणात कुणाचाही दबाव नाही. सुनील टिंगरे ‌यांचे नाव घेतले जात होते, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. चौकशीअंती 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८