Cyclone Remal : महाराष्ट्रालाही रेमल चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

'या' सेवा काही तासांसाठी राहणार बंद


मुंबई : देशातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असताना सध्या बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळाचा (Cyclone Remal) धोका निर्माण झाला आहे. या रेमल चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ आज भारतातील काही भागात पोहोचणार असून रौद्र रुप धारण करणार आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत राज्य प्रशासनाने खबरदारीचे काही उपाय जारी केले.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात १.५ मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना बंगाल उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाण्यास मज्जाव केला आहे. त्याशिवाय रेमलच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.


दरम्यान, आज रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकणार असून खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू आणि कंटेनर हाताळणी व्यवस्था १२ तासांसाठी बंद असणार आहे.



'या' भागात पावसाचा इशारा


हवामान विभागाकडून ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये २७ आणि २८ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



'रेमल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?


हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


­

Comments
Add Comment

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी