मुंबई : मुंबईत गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण तयार होत असले तरी पाऊस बरसलेला नाही. मात्र, आज मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ तासामध्ये कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील असंही सांगण्यात आलं आहे.
मान्सूनचे आगमन ३१ मे दरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढचे तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मुरूड जंजिरा किल्लाही आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
लवकरच येणार 'ती' न्यूज... मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान…
दुर्घटनेत ५ जवान शहीद लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.…
परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…
दोन मुली व एक महिला गंभीर जखमी पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात (Pune Porsche Accident)…
मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…
पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…