Narendra Modi : ४ जूनला संध्याकाळी इंडिया आघाडीमध्ये फूट पडणार!

बिहारमध्ये गोरगरिबांना लुटणार्‍यांना तुरुंगात जावंच लागेल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारमधून हल्लाबोल


पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान (Voting) पाच टप्प्यांत पूर्ण झाले असून आज देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात बिहारमधील ४० जागांपैकी ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. अंतिम टप्प्यात मतदान होत असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश व बिहार ही मोठी राज्ये आहेत. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) बिहारमध्ये जाहीर सभा घेत स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटलीपुत्रनंतर काराकाट येथे जाहीर सभा घेतली. येथील एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी मोदींची सभा पार पडली.


मोदींनी बिहारमधून इंडिया आघाडी आणि आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारमध्ये गरिंबाना लुटणारा कितीही मोठा शहंशाह असो, कितीही मोठा राजकुमार असो, त्याला तुरुंगात जावेच लागणार. तुरुंगातील भाकरी खावीच लागेल, ही एनडीए सरकार आणि मोदीची गॅरंटी आहे, असे मोदीजींनी म्हटले.


या सभेत नोकरीच्या बदल्यात जमीन देण्याच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मोदींनी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांनी गरिबांना लुटून नोकरीच्या बदल्यात जमीन लिहून घेतल्या. त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, आता त्यांचं तुरुंगात जाण्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. हेलिकॉप्टरमध्ये चक्कर मारणं पूर्ण होताच तुरुंगात जाण्याचा रस्ता निश्चित होईल. बिहारला लुटणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी थेट इशारा दिला आहे.



इंडिया आघाडीमध्ये फूट पडणार


४ जून रोजी संध्याकाळी इंडी आघाडीमध्ये फूट पडणार आहे. आरजेडीवाले म्हणतील की काँग्रेसने डुबवलं, हे एकमेकांचे कपडे फाडायला सुरु करतील. तर काँग्रेसचं शाही कुटुंब पराभवाचा ठिपका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर ठेवून विदेशात सुट्टी एन्जॉय करायला जाईल. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाऊन मल्लिकार्जुन खर्गे थकून जातील, असेही मोदींनी म्हटले. तसेच, आरजेडी, काँग्रेस व इंडिया आघाडीला देशाने अनेकवेळा नाकारल्याचीही त्यांनी टीका केली.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.