Telecommunication : केंद्र सरकारची मोठी कारवाई! 'या' कारणामुळे तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद

जाणून घ्या नेमकं कारण काय


मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा यासह मोबाईलही आता माणसाची मुलभूत गरज बनली आहे. मोबाईलचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. मात्र याच मोबाईलबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील तब्बल ६ लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत.


दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही मोबाईल क्रमांक हे चुकीचे कनेक्शन, बनावट ओळख व कागदपत्रांच्या आधारे घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाकडून मोबाईल कंपन्यांना ६ लाख ८० हजार मोबाईल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्यास सांगितली आहे. विभागाकडून या तपासासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पडताळणी न केल्यास हे संशयास्पद क्रमांक ब्लॉक केले जातील, अशी माहिती दिली आहे.



काय होणार कारवाई?


दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना या चिन्हांकित मोबाइल क्रमांकाची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांना ६० दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पडताळणीमध्ये कनेक्शन अयशस्वी झाल्यास ते बंद केले जाईल.

Comments
Add Comment

Petrol-Diesel Stock : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरेसा साठा - केंद्र सरकार

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; सोशल मीडिया खाते पूर्ववत करण्याबाबत दिला मोठा निर्णय

नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party - CJP) दिल्ली उच्च न्यायालयाकडून

IPL Final 2026 : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! IPL फायनलसाठी मुंबई ते अहमदाबाद धावणार 'स्पेशल ट्रेन'

मुंबई : अहमदाबाद (Ahemdabad) येथे होणाऱ्या आयपीएल (IPL) २०२६ च्या महामुकाबल्याचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन अनुभवू

Nisos Keros Indian Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनी पार करत ‘निसोस केरोस’ जहाज भारताकडे रवाना

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीदरम्यान भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Crime News : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू आणि पतीला CBI कोठडी

भोपाळ : जिल्हा सत्र न्यायालयाने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू गिरीबाला सिंह आणि पती समर्थ सिंह या दोघांना

Betwa River Bridge Collapses : उत्तर प्रदेशात बेतवा नदीवरील बांधकामाधीन पुलाचा स्लॅब कोसळून सहा मजुरांचा मृत्यू;अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

- बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर