Weather Update : दक्षिण भारतात मान्सूनचे वारे; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा!

  191

जाणून घ्या हवामान वृत्त काय म्हणते


मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता मान्सून (Monsoon) अंदमानमध्ये धडकल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी होणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) याबाबत महत्त्वाची माहिती देत काही राज्यांसाठी सावधानतेचा इशारा जारी केला आहे.


अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सून वाऱ्यांनी आता देश व्यापण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा वेग पाहता देशासह राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



'या' भागात वादळी पावसाचा इशारा 


मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



'या' भागात उष्णतेची लाट कायम


उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. तर, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागामध्ये अधूनमधून सूर्य आग ओकणार असून, काही भागांमध्ये उकाडा जाणवणार आहे. तर सायंकाळच्या वेळी आभाळात पावसाळी ढगांचा खेळ पाहायला मिळू शकतो.



कुठवर पोहोचला मान्सून?


सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांचा आणखी काही भाग व्यापणार आहे. त्याचबरोबर केरळच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल