Water Shortage : मुंबईकरांवर पाणीबाणी! 'या' भागातील पाणीपुरवठा पुढचे दोन दिवस बंद

मुंबई : एकीकडे उष्णतेच्या लाटेसोबत मुंबईकरांना आता पाणीबाणीच्या संकटाचाही सामना करावा लागणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करुन ठेवावा, तसेच पाणी जपून वापरा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात जलवाहिनीचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी १२०० मिलिमीटर व्यासाठी जलवाहिनी वळवण्याचे काम करण्यात येणार आहे. येत्या २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. परिणामी २४ तासांसाठी घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारी म्हणून ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.



'या' भागातील पाणीपुरवठा बंद


एन विभागातील विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज रुग्णाल आणि गोदरेज प्रॉपर्टीज भागातील पाणीपुरवठा २५ मे मध्यरात्रीपासून सकाळी ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.


तसेच एस विभाग - नाहूर (पूर्व), कांजूर (पूर्व) भांडुप (पूर्व), संपूर्ण परिसर, टागोर नगर, कन्नमवार नगर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर, सीएट टायर मार्ग लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या