Water Shortage : मुंबईकरांवर पाणीबाणी! 'या' भागातील पाणीपुरवठा पुढचे दोन दिवस बंद

मुंबई : एकीकडे उष्णतेच्या लाटेसोबत मुंबईकरांना आता पाणीबाणीच्या संकटाचाही सामना करावा लागणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करुन ठेवावा, तसेच पाणी जपून वापरा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात जलवाहिनीचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी १२०० मिलिमीटर व्यासाठी जलवाहिनी वळवण्याचे काम करण्यात येणार आहे. येत्या २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. परिणामी २४ तासांसाठी घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारी म्हणून ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.



'या' भागातील पाणीपुरवठा बंद


एन विभागातील विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज रुग्णाल आणि गोदरेज प्रॉपर्टीज भागातील पाणीपुरवठा २५ मे मध्यरात्रीपासून सकाळी ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.


तसेच एस विभाग - नाहूर (पूर्व), कांजूर (पूर्व) भांडुप (पूर्व), संपूर्ण परिसर, टागोर नगर, कन्नमवार नगर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर, सीएट टायर मार्ग लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती