काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना त्यांच्या भाषणात संयम ठेवण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितले.लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते आपल्या भाषणात संविधान वाचवण्याचा आणि अग्निवीर योजनेचा वारंवार उल्लेख करत आहेत. तर भाजप नेते आपल्या भाषणात मुस्लिम आणि धर्मावर भर देत आहेत. आयोगाने दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक विधाने करू नयेत असे निर्देश दिले आहेत.


आयोगाने स्टार प्रचारकांऐवजी पक्षाध्यक्षांना नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे तर राहुल गांधी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्षांना त्यांच्या भाषणांसाठी जबाबदार धरले आहे.पीएम मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणात आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. हे नेते धर्म, जात, समुदाय आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे आणि द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


समाजात फूट पडेल अशी प्रचार भाषणे थांबवावीत, असे भाजपला सांगण्यात आले आहे.निवडणूक आयोगाने काँग्रेसला संविधानाबाबत खोटी विधाने करू नये असे सांगितले. जसे की, भारतीय राज्यघटना रद्द केली जाऊ शकते किंवा विकली जाऊ शकते. याशिवाय, अग्निवीरवर बोलताना निवडणूक आयोगाने काँग्रेसला संरक्षण दलाचे राजकारण करू नका, असे सांगितले.


राहुल गांधींनी लष्करावर केलेल्या वक्तव्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ 14 मे रोजी निवडणूक आयोगाकडे पोहोचले. राहुल 13 मे रोजी रायबरेलीमध्ये म्हणाले होते – मोदींनी दोन प्रकारचे सैनिक तयार केले आहेत. एक गरीब, मागास, आदिवासी आणि दलितांचा मुलगा आणि दुसरा श्रीमंत घराण्याचा मुलगा.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आयोगाचे कार्यालय गाठून राहुल आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली. हा थेट सैनिकांवर हल्ला असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला हा वादाचा मुद्दा बनवून सैनिकांचे मनोधैर्य खचवायचे आहे. हा निवडणुकीचा मुद्दा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. चीनपासून देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर गांभीर्याने आपली संपूर्ण ताकद वापरत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, काँग्रेसने भारतीय लष्करावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जेव्हा आमच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांना पुढे येण्यापासून रोखले होते आणि त्यांचा पाठलाग केला होता. त्यावेळीही राहुल गांधी यांनी भारतीय जवानांना मारहाण झाल्याचे संसदेत म्हटले होते. हे अपमान आपण पाहत आलो आहोत. याआधीही जेव्हा जवानांनी बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा या लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते, जेव्हा आम्ही उरीमध्ये कारवाई केली तेव्हा या लोकांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. जयशंकर पुढे म्हणाले की, राजकीय कारणांमुळे आमच्या सैनिकांवर असे हल्ले देश खपवून घेणार नाही.


काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारींच्या आधारे निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाने 25 एप्रिल रोजी दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटिसा बजावल्या होत्या. आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारींवरून लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 77 अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Shocking Incident : पप्पा, मला त्रास होतोय, पिरियड्स चालू आहेत... म्हणत लेक गयावया करत होती, पण नराधम बापाला दिसले फक्त ५००० रुपये! वाचा सुन्न करणारी बातमी

चिक्कमगलुरु : समाजात वडिलांना मुलीचे संरक्षक मानले जाते, मात्र कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यातून पितृत्वाला

Hydrogen Train... देशातील पहिली पाण्यावर धावणारी ट्रेन येणार लवकरच येणार सेवेत; कधी कुठे धावणार जाणून घ्या

हरियाणा : भारतात अनेक हायड्रोजनवर आधारित प्रकल्पांवर भर दिला जात आहे. हायड्रोजन कार नंतर आता हायड्रोजन टेन ची ही

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील

Petrol Diesel Price : गुड न्यूज! लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरणार; जाणून घ्या सविस्तर अपडेट

मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी