Igatpuri news : भावली दुर्घटना ताजी असतानाच इगतपुरीमध्ये विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू!

विहिरीला कठडा नसल्याने बुडल्याची शक्यता


नाशिक : इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरणावर (Bhavali Dam) फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा काल बुडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता इगतपुरीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोघी मायलेकी असल्याचे समजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका नवनाथ दराणे (२३ वर्षे) आणि वेदश्री नवनाथ दराणे (३ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे. विहिरीला कठडा नसल्यामुळे विहिरीजवळ गेलेली बालिका विहिरीत पडली असावी व बालिकेला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.


या दोघीही येथून जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. विहिरीत मायलेकीचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी