IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल.


या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानच्या संघासमोर आत्मविश्वासाने भरलेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचे मोठे आव्हान असणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृ्त्वात आरसीबीने चमत्कारिक कामगिरी करत प्लेऑफ गाठली आहे.



सलग ६ सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचला बंगळुरूचा संघ


एक वेळ अशी होती की राजस्थान टॉप २मध्ये राहील असे वाटत होते. मात्र सलग ४ सामन्यातील पराभव आणि केकेआरविरुद्धचा सामना पावसाने धुतला गेल्याने ते सनरायजर्स हैदराबादनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. दुसरीकडे आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत असलेला बंगळुरूच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत चौथे स्थान गाठले.


बंगळुरूने सलग ६ सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता.



अहमदाबादमध्ये या संघाचे पारडे जड


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजचा सामना रंगत आहे. या मैदानावर या हंगामात १२ डावांत केवळ दोनवेळा २०० पार धावसंख्या झाली आहे. हे स्टेडियम रॉयल्सच्या गोलंदाजांना फायदेशीर ठरू शकते. शिस्तीने गोलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड ठरू शकते.


Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या