IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

  44

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल.


या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानच्या संघासमोर आत्मविश्वासाने भरलेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचे मोठे आव्हान असणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृ्त्वात आरसीबीने चमत्कारिक कामगिरी करत प्लेऑफ गाठली आहे.



सलग ६ सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचला बंगळुरूचा संघ


एक वेळ अशी होती की राजस्थान टॉप २मध्ये राहील असे वाटत होते. मात्र सलग ४ सामन्यातील पराभव आणि केकेआरविरुद्धचा सामना पावसाने धुतला गेल्याने ते सनरायजर्स हैदराबादनंतर तिसऱ्या स्थानावर राहिले. दुसरीकडे आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत असलेला बंगळुरूच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत चौथे स्थान गाठले.


बंगळुरूने सलग ६ सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता.



अहमदाबादमध्ये या संघाचे पारडे जड


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजचा सामना रंगत आहे. या मैदानावर या हंगामात १२ डावांत केवळ दोनवेळा २०० पार धावसंख्या झाली आहे. हे स्टेडियम रॉयल्सच्या गोलंदाजांना फायदेशीर ठरू शकते. शिस्तीने गोलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड ठरू शकते.


Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र