Amruta Fadnavis : शेम ऑन ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड!

पुणे अपघातप्रकरणी अमृता फडणवीसांनी व्यक्त केला तीव्र संताप


मुंबई : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) हा १७ वर्षांचा असून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्यामुळेच त्याच्यावर ठोस कारवाई अद्यापही करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कारवाईची माहिती दिली. या कारवाईदरम्यान, ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने (Juvenile Justice Board) अनपेक्षित भूमिका घेतल्याचे समजले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


आरोपीचे वय १७ वर्षे व ८ महिने असल्यामुळे निर्भयाकांडानंतर कायद्यात झालेल्या अमेंडमेंटनुसार आरोपीला प्रौढ समजून खटला चालवण्यास परवानगी द्यावी, अशा प्रकारे पुणे पोलिसांनी ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डकडे अॅप्लिकेशन केलं होतं. दुर्दैवाने ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डने हे अॅप्लिकेशन केवळ सीन आणि फाईल्ड केल्याने पोलिसांसाठीही हा धक्का ठरला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर पुणे पोलिसांनी वरच्या कोर्टात केलेल्या अर्जानंतर ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डला ऑर्डर रिन्यू करण्यास सांगितले आहे.





या संपूर्ण प्रकारावर अमृता फडणवीस यांनी परखड मत मांडलं आहे. दोन निष्पाप जीवांचा यात बळी गेल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठीण कारवाईची मागणी केली आहे. एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, 'पुण्यातील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. पण यातील प्रमुख आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. बाल न्याय मंडळानं त्याला दिलेला जामीन हा लाजीरवाणा निकाल आहे', असं त्या म्हणाल्या आहेत.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील