Salary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा 'हा' फॉर्म्युला वापरा

खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण!


मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते. देशातील प्रत्येक नागरिकाची एकच तक्रार असते, ती म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार बँक अकाउंटमध्ये जमा होतो मात्र महिनाअखेर येताच तो संपतो. पगारातील एक रुपयाही वाचत नाही आणि कुठे खर्च झाला तेदेखील समजत नाही. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे अनेकांसमोर काय खावं आणि काय वाचवावं असा मोठा प्रश्न उभा राहतो. मात्र आता नागरिकांना या गोष्टीची चिंता करावी लागणार नाही. कारण सेव्हिंगचा 'हा' फॉर्म्युला वापरल्यानंतर खर्चानंतरही पैशांची अडचण भासणार नाही. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.


सेव्हिंगचा '५०:३०:२०' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फॉर्म्युल्याचा अवलंब करुन तुम्ही आता सहज बचत करू शकणार आहात. तसेच हा फॉर्म्युला लागू करून खर्च केल्यानंतरही बचतीसाठी पैसे वाचवू शकाल.



५०:३०:२० बचतीचे सूत्र


फॉर्म्युलानुसार तुमची कमाई तीन भागात विभागण्याची गरज आहे. अन्न, निवारा, आणि शिक्षण यांसह अत्यावश्यक गरजांवर कमाईतील पहिले ५०% खर्च केले पाहिजे. म्हणजे तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुमचे मासिक भाडे किंवा गृहकर्ज सुरू असेल, तर तुमचा EMI खर्च या ५० टक्के मध्ये जोडला जाऊ शकतो.



३० टक्के पगार कुठे खर्च करावा 


उत्पन्नाच्या ३० टक्के रक्कम तुमची आवड आणि इच्छांशी संबंधित गोष्टींवर खर्च करा. ज्यामध्ये बाहेर जाऊन खाणे, चित्रपट पाहणे, गॅजेट्स, कपडे, कार, बाईक आणि वैद्यकीय खर्चांसाठी कमाईतील ३० टक्के रक्कम बाजूला ठेवा. त्यानंतर उर्वरित २० टक्के बचत केली पाहिजे आणि नंतर ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे जेणेकरून तिचा चांगला परतावा मिळू शकेल.



अखेरीस बचत करणेही आवश्यक


५०:३०:२० फॉर्म्युलानुसार उर्वरित २०टक्के आधी जतन केले पाहिजे आणि नंतर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजेच ५०,००० रुपये पगार असलेल्या व्यक्तीने कमाईतील १० हजार रुपये गुंतवले पाहिजेत ज्यासाठी म्युच्युअल फंडात दर महिन्याला एसआयपी आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय आहेत. या फॉर्म्युल्यानुसार ५० हजार रुपये कमावणारी व्यक्ती वार्षिक किमान १.२० लाखांची बचत करु शकतो.

Comments
Add Comment

Sandeep lamichhane : संदीप लामिछानेने केला वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम

त्रिभुवन : नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड या वन डे मध्ये

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.