IPL: हे आहेत आयपीएलमधील सर्वाधिक सामने हरणारे कर्णधार

  78

मुंबई: यंदाच्या वर्षी आयपीएलचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. या १७ वर्षात धोनी आणि रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार ठरले, मात्र तुम्हाला माहीत आहे का की सर्वाधिक सामने हरण्याच्या कर्णधारांच्या यादीत कोण कोण आहे.


महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सला माहीने ५ वेळा विजेतेपद जिंकून दिले. मात्र तुम्हाला माहीत आहे का की कॅप्टन कूल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने हरणारा कर्णधारही आहे. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ९१ सामने हरले आहेत.


या यादीत दुसरा नंबर लागतो विराट कोहलीचा विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूला ७० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.


यानंतर तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहितच्या नेतृ्त्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकला. मात्र तो सर्वाधिक सामने हरणारा तिसरा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात ६७ सामन्यात पराभव मिळाला आहे.


या दिग्गजानंतर गौतम गंभीरचे नाव आहे. गंभीरला कर्णधार म्हणून ५७ सामन्यात पराभव सहन करावा लागला. या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही भूषवले.


डेविड वॉर्नरचा यामध्ये पाचवा नंबर लागतो. डेविडने कर्णधार म्हणून ४० सामने हरले आहेत. यानंतर अॅडम गिलख्रिस्ट. त्याने कर्णधार म्हणून ३९ सामन्यात पराभव पाहिला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र