IPL: हे आहेत आयपीएलमधील सर्वाधिक सामने हरणारे कर्णधार

मुंबई: यंदाच्या वर्षी आयपीएलचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. या १७ वर्षात धोनी आणि रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार ठरले, मात्र तुम्हाला माहीत आहे का की सर्वाधिक सामने हरण्याच्या कर्णधारांच्या यादीत कोण कोण आहे.


महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सला माहीने ५ वेळा विजेतेपद जिंकून दिले. मात्र तुम्हाला माहीत आहे का की कॅप्टन कूल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने हरणारा कर्णधारही आहे. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ९१ सामने हरले आहेत.


या यादीत दुसरा नंबर लागतो विराट कोहलीचा विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूला ७० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.


यानंतर तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहितच्या नेतृ्त्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकला. मात्र तो सर्वाधिक सामने हरणारा तिसरा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात ६७ सामन्यात पराभव मिळाला आहे.


या दिग्गजानंतर गौतम गंभीरचे नाव आहे. गंभीरला कर्णधार म्हणून ५७ सामन्यात पराभव सहन करावा लागला. या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही भूषवले.


डेविड वॉर्नरचा यामध्ये पाचवा नंबर लागतो. डेविडने कर्णधार म्हणून ४० सामने हरले आहेत. यानंतर अॅडम गिलख्रिस्ट. त्याने कर्णधार म्हणून ३९ सामन्यात पराभव पाहिला.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.