IPL: हे आहेत आयपीएलमधील सर्वाधिक सामने हरणारे कर्णधार

मुंबई: यंदाच्या वर्षी आयपीएलचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. या १७ वर्षात धोनी आणि रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार ठरले, मात्र तुम्हाला माहीत आहे का की सर्वाधिक सामने हरण्याच्या कर्णधारांच्या यादीत कोण कोण आहे.


महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सला माहीने ५ वेळा विजेतेपद जिंकून दिले. मात्र तुम्हाला माहीत आहे का की कॅप्टन कूल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने हरणारा कर्णधारही आहे. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ९१ सामने हरले आहेत.


या यादीत दुसरा नंबर लागतो विराट कोहलीचा विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूला ७० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.


यानंतर तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहितच्या नेतृ्त्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा खिताब जिंकला. मात्र तो सर्वाधिक सामने हरणारा तिसरा कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात ६७ सामन्यात पराभव मिळाला आहे.


या दिग्गजानंतर गौतम गंभीरचे नाव आहे. गंभीरला कर्णधार म्हणून ५७ सामन्यात पराभव सहन करावा लागला. या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही भूषवले.


डेविड वॉर्नरचा यामध्ये पाचवा नंबर लागतो. डेविडने कर्णधार म्हणून ४० सामने हरले आहेत. यानंतर अॅडम गिलख्रिस्ट. त्याने कर्णधार म्हणून ३९ सामन्यात पराभव पाहिला.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण