HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर! 'मुलींची बाजी आणि कोकण टॉप'ची परंपरा कायम

मुंबई विभागाने मात्र गाठला तळ


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल (Maharashtra Board 12th Result) जाहीर केला आहे. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोकण विभाग उत्तीर्णतेच्या टक्केवारीत टॉपला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.


महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष २०२४ चा निकाल हा ९३.३७ टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.९१ % लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल ९१.९५ % लागला आहे.


राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. यावर्षी ९४.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.६० टक्के आहे. कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागला हे जाणून घ्या -
कोकण - ९७.९१ %
नाशिक - ९४.७१%
पुणे - ९४.४४%
कोल्हापूर - ९४.२४%
संभाजी नगर - ९४.०८%
अमरावती - ९३%
लातूर - ९२.३६%
नागपूर - ९२.१२%
मुंबई - ९१.९५


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध