HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर! 'मुलींची बाजी आणि कोकण टॉप'ची परंपरा कायम

मुंबई विभागाने मात्र गाठला तळ


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल (Maharashtra Board 12th Result) जाहीर केला आहे. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोकण विभाग उत्तीर्णतेच्या टक्केवारीत टॉपला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.


महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष २०२४ चा निकाल हा ९३.३७ टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.९१ % लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल ९१.९५ % लागला आहे.


राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. यावर्षी ९४.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.६० टक्के आहे. कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागला हे जाणून घ्या -
कोकण - ९७.९१ %
नाशिक - ९४.७१%
पुणे - ९४.४४%
कोल्हापूर - ९४.२४%
संभाजी नगर - ९४.०८%
अमरावती - ९३%
लातूर - ९२.३६%
नागपूर - ९२.१२%
मुंबई - ९१.९५


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार