HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर! 'मुलींची बाजी आणि कोकण टॉप'ची परंपरा कायम

  102

मुंबई विभागाने मात्र गाठला तळ


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल (Maharashtra Board 12th Result) जाहीर केला आहे. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोकण विभाग उत्तीर्णतेच्या टक्केवारीत टॉपला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.


महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष २०२४ चा निकाल हा ९३.३७ टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.९१ % लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल ९१.९५ % लागला आहे.


राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. यावर्षी ९४.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.६० टक्के आहे. कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागला हे जाणून घ्या -
कोकण - ९७.९१ %
नाशिक - ९४.७१%
पुणे - ९४.४४%
कोल्हापूर - ९४.२४%
संभाजी नगर - ९४.०८%
अमरावती - ९३%
लातूर - ९२.३६%
नागपूर - ९२.१२%
मुंबई - ९१.९५


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,