मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल (Maharashtra Board 12th Result) जाहीर केला आहे. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोकण विभाग उत्तीर्णतेच्या टक्केवारीत टॉपला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष २०२४ चा निकाल हा ९३.३७ टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.९१ % लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल ९१.९५ % लागला आहे.
राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. यावर्षी ९४.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.६० टक्के आहे. कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागला हे जाणून घ्या –
कोकण – ९७.९१ %
नाशिक – ९४.७१%
पुणे – ९४.४४%
कोल्हापूर – ९४.२४%
संभाजी नगर – ९४.०८%
अमरावती – ९३%
लातूर – ९२.३६%
नागपूर – ९२.१२%
मुंबई – ९१.९५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.
पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…
पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…
AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…