Delhi schools : वाढत्या उष्माघाताचा दिल्ली सरकारने घेतला धसका; केली मोठी घोषणा!

'या' तारखेपर्यंत शाळांना सुट्ट्या


नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी सूर्य आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दिल्लीसुद्धा सध्या प्रचंड उकाड्याने होरपळत असल्याचं दिसून येत आहे. दक्षिण भारतात पावसाने हजेरी लावली असून उत्तरेत मात्र उन्हाचा तडाखा बसला आहे. जर उत्तर भारतात पाऊस पडला नाही तर दिल्लीत पारा ४५ अंशांच्या पुढे जाऊ शकतो, असा हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. याच वाढत्या उष्मघाताचा धसका घेत दिल्ली सरकारने शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.


दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व शाळा प्रमुखांना उन्हाळी सुट्टीसाठी शाळा बंद ठेवण्याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. तसेच याबाबत परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ११ मे रोजीच सरकारी शाळा बंद होत्या. मात्र, काही खासगी शाळा सुरू असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर दिल्ली सरकारने शाळांमध्ये ११ मे ते ३० जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, राजस्थानमध्ये देखील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १४ मे पासून ३० जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्यात यावं, असं शिक्षण विभागाने बजावलं आहे. अन्यथा कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेत. तर नोएडामध्ये देखील सुट्ट्यांचे आदेश दिले जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी