Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल १८ लाख लोकांचे सिमकार्ड (SIM cards) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एकाच वेळी तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करणार आहे. या कारवाई अंतर्गत सरकारने काही दिवसापूर्वी देशातील टेलिकॉम कंपनी Jio, Airtel आणि Vi यांना २८ हजार पेक्षा जास्त सिम कार्ड बंद करण्याचे आदेश दिले होते.


देशात दिवसेंदिवस लोकांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे. यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याच बरोबर सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना लाखो सिमकार्ड्सची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाई अंतर्गत सरकार पुढील १५ दिवसांसाठी सिमकार्ड ब्लॉक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चुकीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सिमकार्डवर या पद्धतीने सरकार नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे.


केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य सिमकार्ड वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मात्र जे लोक चुकीच्या कामांसाठी सिम कार्डचा वापर करत असतील तर त्यांच्यावर सरकारच्या या निर्णयानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.