Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल १८ लाख लोकांचे सिमकार्ड (SIM cards) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एकाच वेळी तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करणार आहे. या कारवाई अंतर्गत सरकारने काही दिवसापूर्वी देशातील टेलिकॉम कंपनी Jio, Airtel आणि Vi यांना २८ हजार पेक्षा जास्त सिम कार्ड बंद करण्याचे आदेश दिले होते.


देशात दिवसेंदिवस लोकांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे. यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याच बरोबर सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना लाखो सिमकार्ड्सची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाई अंतर्गत सरकार पुढील १५ दिवसांसाठी सिमकार्ड ब्लॉक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चुकीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सिमकार्डवर या पद्धतीने सरकार नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे.


केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य सिमकार्ड वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मात्र जे लोक चुकीच्या कामांसाठी सिम कार्डचा वापर करत असतील तर त्यांच्यावर सरकारच्या या निर्णयानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा