Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल १८ लाख लोकांचे सिमकार्ड (SIM cards) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एकाच वेळी तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करणार आहे. या कारवाई अंतर्गत सरकारने काही दिवसापूर्वी देशातील टेलिकॉम कंपनी Jio, Airtel आणि Vi यांना २८ हजार पेक्षा जास्त सिम कार्ड बंद करण्याचे आदेश दिले होते.


देशात दिवसेंदिवस लोकांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे. यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याच बरोबर सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना लाखो सिमकार्ड्सची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाई अंतर्गत सरकार पुढील १५ दिवसांसाठी सिमकार्ड ब्लॉक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चुकीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सिमकार्डवर या पद्धतीने सरकार नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे.


केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य सिमकार्ड वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मात्र जे लोक चुकीच्या कामांसाठी सिम कार्डचा वापर करत असतील तर त्यांच्यावर सरकारच्या या निर्णयानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: