Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळपासूनच नोकरी करणार्‍या तरुणांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असं आवाहन करतानाच त्यांनी विरोधकांनाही जबरदस्त टोला लगावला आहे. त्याचबरोबर राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


मुख्यमंत्री म्हणाले, आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या, त्या दूर झाल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत. त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली.


फतवे काढणे ही आश्चर्यकारक आहे, असं घडणं चुकीचं आहे. विकास आम्ही करतोय. कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करत आहेत. जे ५०-६० वर्षे काँग्रेसला करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे. त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.



उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत


ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बालेकिल्ला आहे. ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांची तोंडं फुटतील, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना