Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

  89

कारण सांगताच घरचेही अवाक


नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी याबाबत दिल्ली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासकार्य सुरु केले. सीसीटीव्ही फुटेज, गुरुचरण यांच्या मोबाईलचे लोकेशन अशा अनेक गोष्टींमार्फत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी 'तारक मेहता का अलटा चष्मा'च्या सेटवर जाऊन सर्व कलाकारांचीही चौकशी केली. मात्र, त्यांचे वेतन थकवले असल्याचीही कोणती समस्या नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. मात्र, आज अचानक तब्बल २५ दिवसांनंतर बेपत्ता गुरुचरण सिंग आपल्या घरी परतले आहेत. त्यांनी बेपत्ता झाल्याचे कारण सांगितल्यानंतर घरचेही अवाक झाले आहेत.


गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांना त्यांनी सांगितलं की, "मी संसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासाला निघालो होतो. दरम्यान, मी अमृतसर, नंतर लुधियाना आणि इतर अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये बरेच दिवस राहिलो. तेव्हा मला वाटलं की आपण घरी परतावे. त्यामुळे मी घरी परतलो."


२२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंग घरातून निघाला होते. मात्र ते बेपत्ता झाल्याची बातमी २६ एप्रिल रोजी समोर आली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीत जाणार होते. यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.



'तारक मेहता का उल्टा चष्मा' मुळे मिळाली लोकप्रियता


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील रोशन सिंग सोढी या भूमिकेमुळे ​​गुरुचरण सिंग यांना विशेष लोकप्रियता मिळाली. २००८-२०१३ पर्यंत ते या शोचा भाग होते. यानंतर त्यांनी शोचा निरोप घेतला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना शोमध्ये परत बोलावण्यात आले. पण २०२० मध्ये गुरुचरण यांनी पुन्हा वडिलांची काळजी घेण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला होता, असं म्हटलं जातं.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर