चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. यात बसमधील ८ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला तर २४ पेक्षा अधिक जखमी झालेत.


या अपघातात बळी पडलेले लोक पंजाब आणि चंदीगड येथे राहाणारे आहेत. हे भक्तगण मथुरा आणि वृदांवन येथून दर्शन करून परतत होते. बसमध्ये प्रवास करत अलेलल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे भक्तगण शुक्रवारी वाराणसी आणि मथुरा वृदांवन दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये ६० प्रवासी होते. यात महिला आणि मुलांचा समावेश होता. हे सर्व जवळचे नातेवाईक होते. पंजाबच्या लुधियाना होशियारपूर आणि चंदीगड येथे राहणारे होते.


शुक्रवार-शनिवारच्या रात्री ते दर्शन करून परतत होते. रात्री उशिरा साधारण दीड वाजण्याच्या सुमारास बसमध्ये आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांनी चालत्या बसला आग लागल्याचे पाहिले. त्यांनी आवाज देत चालकाला बस रोखण्यास सांगितले मात्र बस थांबली नाही. त्यानंतर एका तरुणाने मोटारसायकलवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला आग लागल्याची सूचना दिली.


जोपर्यंत बस थांबली होती तोपर्यंत आग बरीच पसरली होती. ग्रामस्थांनी आपल्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि फायर ब्रिगेडची गाडी उशिरा तेथे पोहोचली. मात्र तोपर्यंत अनेक लोकांचा जळून मृत्यू झाला होता. यात ८ जणांचा जळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला