चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. यात बसमधील ८ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला तर २४ पेक्षा अधिक जखमी झालेत.


या अपघातात बळी पडलेले लोक पंजाब आणि चंदीगड येथे राहाणारे आहेत. हे भक्तगण मथुरा आणि वृदांवन येथून दर्शन करून परतत होते. बसमध्ये प्रवास करत अलेलल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे भक्तगण शुक्रवारी वाराणसी आणि मथुरा वृदांवन दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये ६० प्रवासी होते. यात महिला आणि मुलांचा समावेश होता. हे सर्व जवळचे नातेवाईक होते. पंजाबच्या लुधियाना होशियारपूर आणि चंदीगड येथे राहणारे होते.


शुक्रवार-शनिवारच्या रात्री ते दर्शन करून परतत होते. रात्री उशिरा साधारण दीड वाजण्याच्या सुमारास बसमध्ये आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांनी चालत्या बसला आग लागल्याचे पाहिले. त्यांनी आवाज देत चालकाला बस रोखण्यास सांगितले मात्र बस थांबली नाही. त्यानंतर एका तरुणाने मोटारसायकलवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला आग लागल्याची सूचना दिली.


जोपर्यंत बस थांबली होती तोपर्यंत आग बरीच पसरली होती. ग्रामस्थांनी आपल्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि फायर ब्रिगेडची गाडी उशिरा तेथे पोहोचली. मात्र तोपर्यंत अनेक लोकांचा जळून मृत्यू झाला होता. यात ८ जणांचा जळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा