चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. यात बसमधील ८ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला तर २४ पेक्षा अधिक जखमी झालेत.


या अपघातात बळी पडलेले लोक पंजाब आणि चंदीगड येथे राहाणारे आहेत. हे भक्तगण मथुरा आणि वृदांवन येथून दर्शन करून परतत होते. बसमध्ये प्रवास करत अलेलल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे भक्तगण शुक्रवारी वाराणसी आणि मथुरा वृदांवन दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये ६० प्रवासी होते. यात महिला आणि मुलांचा समावेश होता. हे सर्व जवळचे नातेवाईक होते. पंजाबच्या लुधियाना होशियारपूर आणि चंदीगड येथे राहणारे होते.


शुक्रवार-शनिवारच्या रात्री ते दर्शन करून परतत होते. रात्री उशिरा साधारण दीड वाजण्याच्या सुमारास बसमध्ये आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांनी चालत्या बसला आग लागल्याचे पाहिले. त्यांनी आवाज देत चालकाला बस रोखण्यास सांगितले मात्र बस थांबली नाही. त्यानंतर एका तरुणाने मोटारसायकलवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला आग लागल्याची सूचना दिली.


जोपर्यंत बस थांबली होती तोपर्यंत आग बरीच पसरली होती. ग्रामस्थांनी आपल्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि फायर ब्रिगेडची गाडी उशिरा तेथे पोहोचली. मात्र तोपर्यंत अनेक लोकांचा जळून मृत्यू झाला होता. यात ८ जणांचा जळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे