चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. यात बसमधील ८ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला तर २४ पेक्षा अधिक जखमी झालेत.


या अपघातात बळी पडलेले लोक पंजाब आणि चंदीगड येथे राहाणारे आहेत. हे भक्तगण मथुरा आणि वृदांवन येथून दर्शन करून परतत होते. बसमध्ये प्रवास करत अलेलल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे भक्तगण शुक्रवारी वाराणसी आणि मथुरा वृदांवन दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये ६० प्रवासी होते. यात महिला आणि मुलांचा समावेश होता. हे सर्व जवळचे नातेवाईक होते. पंजाबच्या लुधियाना होशियारपूर आणि चंदीगड येथे राहणारे होते.


शुक्रवार-शनिवारच्या रात्री ते दर्शन करून परतत होते. रात्री उशिरा साधारण दीड वाजण्याच्या सुमारास बसमध्ये आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांनी चालत्या बसला आग लागल्याचे पाहिले. त्यांनी आवाज देत चालकाला बस रोखण्यास सांगितले मात्र बस थांबली नाही. त्यानंतर एका तरुणाने मोटारसायकलवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला आग लागल्याची सूचना दिली.


जोपर्यंत बस थांबली होती तोपर्यंत आग बरीच पसरली होती. ग्रामस्थांनी आपल्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि फायर ब्रिगेडची गाडी उशिरा तेथे पोहोचली. मात्र तोपर्यंत अनेक लोकांचा जळून मृत्यू झाला होता. यात ८ जणांचा जळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

जवाद सिद्दिकीला १३ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली :  दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने

निवडणुकीवर संकट?

आरक्षण मर्यादा प्रकरणी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नवी दिल्ली : राज्यात सध्या सुरू

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini