LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

  85

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादरमधील शिवाजी पार्कवरील मैदानात शुक्रवारी, सायंकाळी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी व राज ठाकरे हे महाआघाडीचा कसा समाचार घेतात, काय तोफ डागतात, याची उत्सुकता मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली व सभोवतालच्या उपनगरातील रहीवाशांना लागून राहीली आहे.


गुरुवारी कल्याण-डोंबिवली, ठाणे व अन्यत्र अवकाळी पाऊस पडल्याने शुक्रवारी महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेवर अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईतील या प्रचारसभेसाठी भाजपा, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, मनसे व महायुतीतील इतर राजकीय मित्र संघटनांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मातोश्रीपासून शिवाजी पार्क अवघ्या काही अंतरावर तसेच शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पंतप्रधान मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इंडिया आघाडी व उबाठा सेनेचे कसे वस्त्रहरण करतात, याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.


शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे. दरम्यान, उद्याच्या शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये अजित पवार उपस्थित नव्हते, पण शुक्रवारी होणाऱ्या सभेला मात्र अजित पवार हजेरी लावणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.


शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान गेली दोन वर्षे मिळाले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणते गौप्यस्फोट करणार आहेत, यावरही राजकीय चर्चा सुरु झालेली आहे. ही निवडणुक महायुतीसाठी प्रतिष्ठेची असल्याने लोकसभेच्या मुंबईतील सहाही मतदारसंघातील मतदारांवर या सभेचा प्रभाव पडणार असल्याने सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त शिवाजी पार्क परिसरात असून गर्दीचा उच्चांक या सभेला होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.