Singapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८ महिन्यांचा पगार

जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब


सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो आणि हा बोनस एक किंवा दोन महिन्यांचा असतो. मात्र एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ८ महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा नफा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या स्वरुपात बोनस दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं नशीब चांगलंच उजळलं आहे. या गोष्टीची जगभरात तुफान चर्चा होत आहे.



सलग दुसऱ्या वर्षी कंपनीचा घसघशीत नफा


'सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड' असं या कंपनीचं नाव आहे. सिंगापूरमधील या सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ८ महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला घसघशीत नफा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षाच्या कमाईपेक्षा यंदाच्या वर्षी कंपनीने अधिक नफा कमावला आहे. त्यामुळेच कंपनीने नफ्यामधून ६.६५ महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिला असून साथीच्या काळातील भरपाई म्हणून १.५ महिन्यांचा अतिरिक्त पगार प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे.


आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या कंपनीने मागील वर्षापेक्षा २४ टक्के अधिक नफा कमवला आहे. कंपनीने कमवलेला नफा हा २.६७ बिलियन सिंगापूर डॉलर्स इतका आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा नफा १६,५३० कोटींहून अधिक रुपयांचा आहे. साथीच्या आजारानंतर परिस्थिती सर्वसामान्य होत असताना विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कंपनीला सातत्याने नफा होत आहे. कंपनीच्या कार्गे सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यामध्ये या विमान कंपनीच्या ९७ टक्क्यांहून अधिक विमानं पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करत होते.



या कंपनीनेही कर्मचाऱ्यांना दिला पाच महिन्यांचा बोनस


केवळ सिंगापूर एअरलाइन्स नाही तर एमिरिट्स एअरलाइन्सनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा बोनस दिला आहे. एमिरिट्सला ५.१ बिलियन अमेरिकी डॉलर्सचा नफा झाला त्यातून त्यांनी कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील