UP News : भयंकर! डॉक्टरांच्या सांगण्यावरून नवजात बालकावर पालकांनी केले 'असे' काही अन्....

घटनेनंतर डॉक्टर फरार; नेमकी चूक कोणाची?


मैनपुरी : नवजात बाळाचा सांभाळ करणे म्हणजे डोळ्यात तेल घालून जपावे लागते. नवजात बाळाला कुठे काही त्रास होत असल्याचा अंदाज आपल्यालाच बांधावा लागतो. त्यामुळे लहान बाळाचे संगोपन करणे कठीण असते. उत्तर प्रदेशातून अशाच एका नवजात बाळाबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कुटुंबीयांनी त्यांच्या ५ दिवसीय नवजात बाळाला उन्हात ठेवलं मात्र त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील घिरोर परिसरातील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती थोडी नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबीयांनी मुलीला साधारण ११.३० वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळे काही वेळातच मुलीची तब्येत बिघडली.


त्यानंतर दुपारी १२ वाजता कुटुंबीयांनी तिला उन्हातून खाली घेऊन आले असता थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी घेतलेली अशी आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहेत.


दरम्यान, पीडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार मैनपुरीच्या सीएमओ डॉ. आरसी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर नेमकं काय घडलं आहे याचे कारण समोर येणार आहे. मात्र, जन्मलेल्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली