UP News : भयंकर! डॉक्टरांच्या सांगण्यावरून नवजात बालकावर पालकांनी केले 'असे' काही अन्....

घटनेनंतर डॉक्टर फरार; नेमकी चूक कोणाची?


मैनपुरी : नवजात बाळाचा सांभाळ करणे म्हणजे डोळ्यात तेल घालून जपावे लागते. नवजात बाळाला कुठे काही त्रास होत असल्याचा अंदाज आपल्यालाच बांधावा लागतो. त्यामुळे लहान बाळाचे संगोपन करणे कठीण असते. उत्तर प्रदेशातून अशाच एका नवजात बाळाबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कुटुंबीयांनी त्यांच्या ५ दिवसीय नवजात बाळाला उन्हात ठेवलं मात्र त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील घिरोर परिसरातील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती थोडी नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबीयांनी मुलीला साधारण ११.३० वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळे काही वेळातच मुलीची तब्येत बिघडली.


त्यानंतर दुपारी १२ वाजता कुटुंबीयांनी तिला उन्हातून खाली घेऊन आले असता थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी घेतलेली अशी आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहेत.


दरम्यान, पीडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार मैनपुरीच्या सीएमओ डॉ. आरसी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर नेमकं काय घडलं आहे याचे कारण समोर येणार आहे. मात्र, जन्मलेल्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात