UP News : भयंकर! डॉक्टरांच्या सांगण्यावरून नवजात बालकावर पालकांनी केले 'असे' काही अन्....

घटनेनंतर डॉक्टर फरार; नेमकी चूक कोणाची?


मैनपुरी : नवजात बाळाचा सांभाळ करणे म्हणजे डोळ्यात तेल घालून जपावे लागते. नवजात बाळाला कुठे काही त्रास होत असल्याचा अंदाज आपल्यालाच बांधावा लागतो. त्यामुळे लहान बाळाचे संगोपन करणे कठीण असते. उत्तर प्रदेशातून अशाच एका नवजात बाळाबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कुटुंबीयांनी त्यांच्या ५ दिवसीय नवजात बाळाला उन्हात ठेवलं मात्र त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील घिरोर परिसरातील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती थोडी नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबीयांनी मुलीला साधारण ११.३० वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळे काही वेळातच मुलीची तब्येत बिघडली.


त्यानंतर दुपारी १२ वाजता कुटुंबीयांनी तिला उन्हातून खाली घेऊन आले असता थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी घेतलेली अशी आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहेत.


दरम्यान, पीडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार मैनपुरीच्या सीएमओ डॉ. आरसी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर नेमकं काय घडलं आहे याचे कारण समोर येणार आहे. मात्र, जन्मलेल्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ