UP News : भयंकर! डॉक्टरांच्या सांगण्यावरून नवजात बालकावर पालकांनी केले 'असे' काही अन्....

घटनेनंतर डॉक्टर फरार; नेमकी चूक कोणाची?


मैनपुरी : नवजात बाळाचा सांभाळ करणे म्हणजे डोळ्यात तेल घालून जपावे लागते. नवजात बाळाला कुठे काही त्रास होत असल्याचा अंदाज आपल्यालाच बांधावा लागतो. त्यामुळे लहान बाळाचे संगोपन करणे कठीण असते. उत्तर प्रदेशातून अशाच एका नवजात बाळाबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कुटुंबीयांनी त्यांच्या ५ दिवसीय नवजात बाळाला उन्हात ठेवलं मात्र त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील घिरोर परिसरातील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती थोडी नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबीयांनी मुलीला साधारण ११.३० वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळे काही वेळातच मुलीची तब्येत बिघडली.


त्यानंतर दुपारी १२ वाजता कुटुंबीयांनी तिला उन्हातून खाली घेऊन आले असता थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी घेतलेली अशी आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहेत.


दरम्यान, पीडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार मैनपुरीच्या सीएमओ डॉ. आरसी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर नेमकं काय घडलं आहे याचे कारण समोर येणार आहे. मात्र, जन्मलेल्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून