Crime : धक्कादायक! मृत रुग्णाच्या आईशी डॉक्टरांचे गैरवर्तन

यवतमाळ : अनेकदा मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम डॉक्टरांकडून केलं जातं त्यामुळे डॉक्टरांना देवाचं दुसरं रुप मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांना मानाचं स्थान दिला जातो. मात्र काही ठिकाणी डॉक्टरांच्या वाईट कृतीमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाला आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टरांकडून एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती उघडकीस येत आहे. यवतमाळमधील गळवा येथे डॉक्टरांकडून एका रुग्णाच्या आईला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील श्याम ज्ञानेश्वर तिजारे हा व्यक्ती काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, आज श्यामचे निधन झाले. दरम्यान, मृतक रूग्णाची आई अन्नपूर्णा तिजारे ही डॉक्टरांना बोलविण्यासाठी गेली असता तिला दोन डॉक्टरांनी मारहाण केली. या घटनेनं शासकीय रुग्णालयात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी केलेली मारहाण तसेच दोन इंजेक्शन दिल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप अन्नपूर्णा तिजारे यांनी केला. मृत श्यामच्या आईने मुलाचे शव ताब्यात घेण्यास नकार देत मारहाण करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी केली आहे.


दरम्यान, मृत रुग्णाच्या आईशी डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे. रुग्णाला टीबी, डायबिटीज असून तीन दिवसापासून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. याप्रकरणाची सखोल चौकशी नेमण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी सांगितले.


Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या