Sangli Crime : धक्कादायक! अंघोळीच्या साबणावरून पती-पत्नीमध्ये जीवघेणा वाद

  108

नवऱ्याला धु-धु धुतलं... पकडीने अंगठा फोडला... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


सांगली : नवरा बायकोच्या पवित्र नात्यात भांडण होणं यात काही नाविन्याची गोष्ट नाहीच. मात्र सांगली येथे एका जोडप्याची छोट्याशा किरकोळ कारणावरुन जबरदस्त वाद झाल्याची घटना घडली आहे. फक्त अंघोळीचा साबण कुठे ठेवला, अशा प्रश्नावर नवऱ्याने उडवा उडवीचं उत्तर दिल्यामुळे नवरा बायकोमध्ये चक्क जीवघेणा वाद झाला आहे. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं असून रागाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली. तर संतापलेल्या बायकोने पकडीने थेट नवऱ्याचा अंगठाच फोडला असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली येथे घडला आहे.



नेमकं घडलं काय?


सांगलीत संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे. सकाळी बायको अंघोळीसाठी जात असताना तिला साबण सापडला नाही. तिने नवऱ्याला साबण कुठे आहे, असं विचारलं. त्यावर तिच्या नवऱ्याने साबण बाथरूममध्ये असेल, असं उत्तर दिलं. या गोष्टीचा राग आल्याने बायकोने नवऱ्याला अपशब्द वापरले. तर तुम्ही मला तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? असा प्रश्न तिने विचारला.


अशा किरकोळ कारणामुळे त्या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. नवऱ्याने देखील बायकोला शिवीगाळ केली. बायकोने नवऱ्याच्या हाताच्या अंगठ्यावर पक्कडने वार केला. यामध्ये नवऱ्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या भांडणावेळी सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही तिच्या नवऱ्याला दमदाटी केली. तर आमच्या मुलीला त्रास देतो, तुला सोडणार नाही असंही नवऱ्याला धमकावले.


दरम्यान, धमकी दिल्यामुळे नवऱ्याने नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवऱ्याने केलेल्या तक्रारीवरून बायकोसह इतर तिघांविरोधात सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून याप्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा