Ghatkopar hoarding news : घाटकोपरमध्ये ४५ तासांनंतरही बचावकार्य सुरु; ३५ ते ४० जण अडकल्याची शक्यता

ढिगारा उपसताना लाल कार दिसली, आतमध्ये...


घाटकोपर : मुंबई आणि इतर परिसरात अवघ्या काही मिनिटांसाठी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. घाटकोपरमधले (Ghatkopar) महाकाय होर्डिंग या वादळी वार्‍यामुळे कोसळून (Hoarding collapse) पेट्रोल पंपावर पडले. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ४५ तास उलटून गेल्यानंतरही या ठिकाणी बचावकार्य सुरुच आहे. हे महाकाय होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा ढिगारा हलवणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच या ढिगार्‍याखाली आणखी ३५ ते ४० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.


बचावकार्य अंतिम टप्प्यात असून आता मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ आणि मुंबई पोलिसांकडून लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पोकलेन आणि गॅस कटरचा वापर केला जात आहे. गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी होर्डिंगचे तुकडे करुन ते क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतले जात आहे. यादरम्यान बचाव पथकांना होर्डिंगखाली दबलेली एक लाल रंगाची गाडी नजरेस पडली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, होर्डिंगच्या एका लोखंडी गर्डरच्या खाली लाल रंगाची गाडी अडकून पडली आहे. लोखंडी होर्डिंगच्या प्रचंड वजनामुळे ही गाडी पूर्णपणे चेपली आहे. या गाडीत एक महिला आणि पुरुष असल्याचे सांगितले जात आहे. गाडीची अवस्था आणि ४५ तासांचा कालावधी लक्षात घेता संबंधित महिला आणि पुरुष वाचण्याची शक्यता फार कमी आहे.


दरम्यान, या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने या परिसरातील अशाचप्रकारची होर्डिंग उतरावयाला सुरुवात केली आहे. ही होर्डिंग्ज लवकरात लवकर उतरवली जातील. जेणेकरुन पावसाळ्याच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, असा पालिकेचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ