Ghatkopar hoarding news : घाटकोपरमध्ये ४५ तासांनंतरही बचावकार्य सुरु; ३५ ते ४० जण अडकल्याची शक्यता

  106

ढिगारा उपसताना लाल कार दिसली, आतमध्ये...


घाटकोपर : मुंबई आणि इतर परिसरात अवघ्या काही मिनिटांसाठी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. घाटकोपरमधले (Ghatkopar) महाकाय होर्डिंग या वादळी वार्‍यामुळे कोसळून (Hoarding collapse) पेट्रोल पंपावर पडले. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ४५ तास उलटून गेल्यानंतरही या ठिकाणी बचावकार्य सुरुच आहे. हे महाकाय होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा ढिगारा हलवणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच या ढिगार्‍याखाली आणखी ३५ ते ४० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.


बचावकार्य अंतिम टप्प्यात असून आता मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ आणि मुंबई पोलिसांकडून लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पोकलेन आणि गॅस कटरचा वापर केला जात आहे. गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी होर्डिंगचे तुकडे करुन ते क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतले जात आहे. यादरम्यान बचाव पथकांना होर्डिंगखाली दबलेली एक लाल रंगाची गाडी नजरेस पडली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, होर्डिंगच्या एका लोखंडी गर्डरच्या खाली लाल रंगाची गाडी अडकून पडली आहे. लोखंडी होर्डिंगच्या प्रचंड वजनामुळे ही गाडी पूर्णपणे चेपली आहे. या गाडीत एक महिला आणि पुरुष असल्याचे सांगितले जात आहे. गाडीची अवस्था आणि ४५ तासांचा कालावधी लक्षात घेता संबंधित महिला आणि पुरुष वाचण्याची शक्यता फार कमी आहे.


दरम्यान, या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने या परिसरातील अशाचप्रकारची होर्डिंग उतरावयाला सुरुवात केली आहे. ही होर्डिंग्ज लवकरात लवकर उतरवली जातील. जेणेकरुन पावसाळ्याच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, असा पालिकेचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.