Weather updaes : मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता! राज्यात इतर ठिकाणी कशी असणार परिस्थिती?

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज


मुंबई : मुंबईसोबतच नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, पालघर, नाशिक परिसरात काल पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हाहाकार माजवला. यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जणांना जीवही गमवावा लागला. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिग (Ghatkopar hoarding news) कोसळले तर वडाळा येथे पार्किंग लॉट कोसळल्याने प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली. यानंतर आज मुंबई व राज्यात इतर ठिकाणी कशी परिस्थिती असेल, याविषयी हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने (Mumbai Center of Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नारिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.



मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा अंदाज


मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे