Team India: राहुल द्रविड यांची टीम इंडियातून होऊ शकते सुट्टी...हेड कोच पदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

  51

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळणार आहे. त्यानंतर भारतीयसंघात मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नवे कोच येऊ शकतात. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रक्रियाही सुरू केली आहे.


बीसीसीआयने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. सोबतच भारतीय बोर्डाने नव्या प्रशिक्षकपदासाठीचे अर्जही मागवले. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.



अर्ज करण्याची २७ मे शेवटची तारीख


बीसीसीआयने द्रविडला वनडे वर्ल्डकप २०२३ पर्यंतसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर भारतीय बोर्डाने टी-२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. हा वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.


मात्र त्याआधी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना अर्जासाठीची शेवटची तारीख २७ मे निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की राहुल द्रविड यांना जर आपला कार्यकाळ वाढवायचा असेल तर ते या पदासाठी पुन्हा अर्ज दाखल करू शकतात. त्यांच्या अर्जावर विचार केला जाईल.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार