मुंबई: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळणार आहे. त्यानंतर भारतीयसंघात मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नवे कोच येऊ शकतात. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रक्रियाही सुरू केली आहे.
बीसीसीआयने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. सोबतच भारतीय बोर्डाने नव्या प्रशिक्षकपदासाठीचे अर्जही मागवले. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.
बीसीसीआयने द्रविडला वनडे वर्ल्डकप २०२३ पर्यंतसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर भारतीय बोर्डाने टी-२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. हा वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.
मात्र त्याआधी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना अर्जासाठीची शेवटची तारीख २७ मे निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की राहुल द्रविड यांना जर आपला कार्यकाळ वाढवायचा असेल तर ते या पदासाठी पुन्हा अर्ज दाखल करू शकतात. त्यांच्या अर्जावर विचार केला जाईल.
भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…
पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…
पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…