Team India: राहुल द्रविड यांची टीम इंडियातून होऊ शकते सुट्टी...हेड कोच पदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळणार आहे. त्यानंतर भारतीयसंघात मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नवे कोच येऊ शकतात. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रक्रियाही सुरू केली आहे.


बीसीसीआयने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. सोबतच भारतीय बोर्डाने नव्या प्रशिक्षकपदासाठीचे अर्जही मागवले. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.



अर्ज करण्याची २७ मे शेवटची तारीख


बीसीसीआयने द्रविडला वनडे वर्ल्डकप २०२३ पर्यंतसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर भारतीय बोर्डाने टी-२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. हा वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.


मात्र त्याआधी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना अर्जासाठीची शेवटची तारीख २७ मे निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की राहुल द्रविड यांना जर आपला कार्यकाळ वाढवायचा असेल तर ते या पदासाठी पुन्हा अर्ज दाखल करू शकतात. त्यांच्या अर्जावर विचार केला जाईल.

Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय