Team India: राहुल द्रविड यांची टीम इंडियातून होऊ शकते सुट्टी...हेड कोच पदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळणार आहे. त्यानंतर भारतीयसंघात मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नवे कोच येऊ शकतात. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रक्रियाही सुरू केली आहे.


बीसीसीआयने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. सोबतच भारतीय बोर्डाने नव्या प्रशिक्षकपदासाठीचे अर्जही मागवले. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.



अर्ज करण्याची २७ मे शेवटची तारीख


बीसीसीआयने द्रविडला वनडे वर्ल्डकप २०२३ पर्यंतसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर भारतीय बोर्डाने टी-२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. हा वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.


मात्र त्याआधी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना अर्जासाठीची शेवटची तारीख २७ मे निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की राहुल द्रविड यांना जर आपला कार्यकाळ वाढवायचा असेल तर ते या पदासाठी पुन्हा अर्ज दाखल करू शकतात. त्यांच्या अर्जावर विचार केला जाईल.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण