Salman Khan House firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात सहावा आरोपी ताब्यात!

  237

मुंबई पोलिसांचे तपासयंत्र वेगाने सुरु


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर १४ एप्रिल रोजी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनी हरियाणातील (Hariyana) फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. हा सहावा आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानंतर आज हरियाणामध्ये ही कारवाई करण्यात आली.


हरपाल सिंग (Harpal Singh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ३७ वर्षांचा आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला आज विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



आठवडाभरापूर्वी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ मे रोजी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक केली होती. राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे आहे. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती.


सलमान खानच्या घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) १ मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. हरपाल सिंगकडून आणखी काय खुलासे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.