मुंबई : मुंबईत काल दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस (Mumbai heavy rain) पडला. अगदी काही मिनिटांसाठी पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग (Ghatkopar hoarding news) कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा १४ वर गेला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊतांशी (Sanjay Raut) संबंध असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, काल वादळामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यात घाटकोपर परिसरात एक मोठं होर्डिंग पडलं. त्यात असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून एक माहिती बाहेर येत आहे की, जी संबंधित होर्डिग लावणारी कंपनी होती तिला आधीच मुंबई महापालिकेने होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस पाठवली होती. कार्यकाळ संपल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली होती. तरीही त्या मालकाने ऐकलं नाही, त्याचं नाव भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) आहे.
आता हा भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनिल राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेने सुनिल राऊतसह मातोश्रीमध्ये जाऊन फोटो काढला होता का? याचं उत्तर संजय राऊतने आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं, असं नितेश राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करत बसायचं, पत्र लिहित बसायचं. मग एक पत्र पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की या भावेश भिंडेचे जे जे पार्टनर आहे, निरपराध लोकांच्या बळीला जे जबाबदार आहेत, त्या सगळ्यांवर एफआयआर दाखल व्हावी, त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करावी. ती होर्डिंग वेळेत काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जीवंत असते, त्यांच्या कुटुंबावर दुखःद प्रसंग आला नसता, म्हणून कारवाई झालीच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…