Nitesh Rane : घाटकोपरमधील होर्डिंग लावणाऱ्या कंपनीच्या मालकाचं उद्धव ठाकरेंशी कनेक्शन!

  160

आमदार नितेश राणे यांचा गंभीर आरोप


मुंबई : मुंबईत काल दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस (Mumbai heavy rain) पडला. अगदी काही मिनिटांसाठी पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग (Ghatkopar hoarding news) कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा १४ वर गेला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊतांशी (Sanjay Raut) संबंध असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे म्हणाले, काल वादळामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यात घाटकोपर परिसरात एक मोठं होर्डिंग पडलं. त्यात असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून एक माहिती बाहेर येत आहे की, जी संबंधित होर्डिग लावणारी कंपनी होती तिला आधीच मुंबई महापालिकेने होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस पाठवली होती. कार्यकाळ संपल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली होती. तरीही त्या मालकाने ऐकलं नाही, त्याचं नाव भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) आहे.


आता हा भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनिल राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेने सुनिल राऊतसह मातोश्रीमध्ये जाऊन फोटो काढला होता का? याचं उत्तर संजय राऊतने आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं, असं नितेश राणे म्हणाले.



पुढे ते म्हणाले, रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करत बसायचं, पत्र लिहित बसायचं. मग एक पत्र पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की या भावेश भिंडेचे जे जे पार्टनर आहे, निरपराध लोकांच्या बळीला जे जबाबदार आहेत, त्या सगळ्यांवर एफआयआर दाखल व्हावी, त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करावी. ती होर्डिंग वेळेत काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जीवंत असते, त्यांच्या कुटुंबावर दुखःद प्रसंग आला नसता, म्हणून कारवाई झालीच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.