Nitesh Rane : घाटकोपरमधील होर्डिंग लावणाऱ्या कंपनीच्या मालकाचं उद्धव ठाकरेंशी कनेक्शन!

आमदार नितेश राणे यांचा गंभीर आरोप


मुंबई : मुंबईत काल दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस (Mumbai heavy rain) पडला. अगदी काही मिनिटांसाठी पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग (Ghatkopar hoarding news) कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा १४ वर गेला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊतांशी (Sanjay Raut) संबंध असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे म्हणाले, काल वादळामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यात घाटकोपर परिसरात एक मोठं होर्डिंग पडलं. त्यात असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून एक माहिती बाहेर येत आहे की, जी संबंधित होर्डिग लावणारी कंपनी होती तिला आधीच मुंबई महापालिकेने होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस पाठवली होती. कार्यकाळ संपल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली होती. तरीही त्या मालकाने ऐकलं नाही, त्याचं नाव भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) आहे.


आता हा भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनिल राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेने सुनिल राऊतसह मातोश्रीमध्ये जाऊन फोटो काढला होता का? याचं उत्तर संजय राऊतने आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं, असं नितेश राणे म्हणाले.



पुढे ते म्हणाले, रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करत बसायचं, पत्र लिहित बसायचं. मग एक पत्र पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की या भावेश भिंडेचे जे जे पार्टनर आहे, निरपराध लोकांच्या बळीला जे जबाबदार आहेत, त्या सगळ्यांवर एफआयआर दाखल व्हावी, त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करावी. ती होर्डिंग वेळेत काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जीवंत असते, त्यांच्या कुटुंबावर दुखःद प्रसंग आला नसता, म्हणून कारवाई झालीच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या