Ghatkopar Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर, ७४ जखमी

मुंबई: मुंबईत सोमवारी अवकाळी पाऊस अचानक अवतरला आणि त्याने रौद्र रूप दाखवले. या पावसाने अनेक बळीही घेतले. घाटकोपर परिसरात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याने अद्याप बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर या दुर्घटनेत ४३ जण जखमी झाले आहे. यातील एकाची स्थिती गंभीर आहे.


जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीएमसीकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार ३१ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. या दुर्घटनेत ८८ जण प्रभावित झाले. त्यातील ७४ जणांना वाचवण्यात यश मिळाले, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 


घाटकोपर परिसरात धूळीचे वादळ आणि पावसामुळे पेट्रोल पंपावर १०० फूट लांब अवैध होर्डिंग पडले. वडाला परिसरातही वेगवान वाऱ्यादरम्यान काम सुरू असलेले मेटल पार्किंग टावर रस्त्यावर कोसळले. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनुसार घाटकोपर परिसरात पडलेले हे होर्डिंग अवैध होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार होर्डिंगखाली दबलेल्या आतापर्यंत ७८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यातील ७० जखमी आहेत.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दु:खद घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला. त्या म्हणाले,या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियाप्रती माझ्या संवेदना कायम आहे. जखमीही लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना मी करते.

Comments
Add Comment

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र