Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय! आता बदलणार परीक्षांची गुणविभागणी

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंडळा कडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाकडून परिक्षांच्या गुणविभागणीत बदल केला जाणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षांदरम्यान ६०-४० ही गुणपद्धती लागू करण्याचा येणार आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना ६० गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनासाठी ४० गुण अशी विभागणी करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले.



'या' आधारे मिळणार ४० गुण


मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील उपस्थिती, प्रात्यक्षिकं, प्रोजेक्ट, टेस्ट आणि असाईन्मेंटचा समावेश असणार आहे. वर्षभर विद्यार्थ्यांचं या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार असून, त्या आधारे त्यांना ४० गुण देण्यात येतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभरात महाविद्यालयात हजर राहणं बांधील असेल.



पुन्हा ६०-४० नुसार गुणांची विभागणी


२०११-१२ मध्ये मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा ६०-४० गुण विभागणीची पद्धत अवलंबात आणली होती. मात्र त्यामध्ये ४० गुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये गैरप्रकार होत असल्याची काही प्रकरणं उघडकीस आली होती. त्यामुळे २०१६-१७ साली ही पद्धत विद्यापीठाने पूर्णपणे बंद केली होती.


दरम्यान, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएससी, बीकॉम आणि बीए या अभ्यासक्रमांकरता ६०-४० गुणविभागणी पद्धत पुन्हा लागू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती विद्यापीठाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली. या गुणविभागणीचा फायदा शैक्षणिक वर्षात होणार असून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण गृहित धरले जाणार असणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात अधिक उपस्थिती असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही काही महाविद्यालयांना या आदेशासंदर्भात स्पष्टोक्ती नसल्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.