Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय! आता बदलणार परीक्षांची गुणविभागणी

  91

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंडळा कडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाकडून परिक्षांच्या गुणविभागणीत बदल केला जाणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षांदरम्यान ६०-४० ही गुणपद्धती लागू करण्याचा येणार आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना ६० गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनासाठी ४० गुण अशी विभागणी करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले.



'या' आधारे मिळणार ४० गुण


मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील उपस्थिती, प्रात्यक्षिकं, प्रोजेक्ट, टेस्ट आणि असाईन्मेंटचा समावेश असणार आहे. वर्षभर विद्यार्थ्यांचं या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार असून, त्या आधारे त्यांना ४० गुण देण्यात येतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभरात महाविद्यालयात हजर राहणं बांधील असेल.



पुन्हा ६०-४० नुसार गुणांची विभागणी


२०११-१२ मध्ये मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा ६०-४० गुण विभागणीची पद्धत अवलंबात आणली होती. मात्र त्यामध्ये ४० गुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये गैरप्रकार होत असल्याची काही प्रकरणं उघडकीस आली होती. त्यामुळे २०१६-१७ साली ही पद्धत विद्यापीठाने पूर्णपणे बंद केली होती.


दरम्यान, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएससी, बीकॉम आणि बीए या अभ्यासक्रमांकरता ६०-४० गुणविभागणी पद्धत पुन्हा लागू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती विद्यापीठाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली. या गुणविभागणीचा फायदा शैक्षणिक वर्षात होणार असून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण गृहित धरले जाणार असणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात अधिक उपस्थिती असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही काही महाविद्यालयांना या आदेशासंदर्भात स्पष्टोक्ती नसल्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या