Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय! आता बदलणार परीक्षांची गुणविभागणी

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंडळा कडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाकडून परिक्षांच्या गुणविभागणीत बदल केला जाणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षांदरम्यान ६०-४० ही गुणपद्धती लागू करण्याचा येणार आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना ६० गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनासाठी ४० गुण अशी विभागणी करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले.



'या' आधारे मिळणार ४० गुण


मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील उपस्थिती, प्रात्यक्षिकं, प्रोजेक्ट, टेस्ट आणि असाईन्मेंटचा समावेश असणार आहे. वर्षभर विद्यार्थ्यांचं या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार असून, त्या आधारे त्यांना ४० गुण देण्यात येतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभरात महाविद्यालयात हजर राहणं बांधील असेल.



पुन्हा ६०-४० नुसार गुणांची विभागणी


२०११-१२ मध्ये मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा ६०-४० गुण विभागणीची पद्धत अवलंबात आणली होती. मात्र त्यामध्ये ४० गुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये गैरप्रकार होत असल्याची काही प्रकरणं उघडकीस आली होती. त्यामुळे २०१६-१७ साली ही पद्धत विद्यापीठाने पूर्णपणे बंद केली होती.


दरम्यान, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएससी, बीकॉम आणि बीए या अभ्यासक्रमांकरता ६०-४० गुणविभागणी पद्धत पुन्हा लागू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती विद्यापीठाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिली. या गुणविभागणीचा फायदा शैक्षणिक वर्षात होणार असून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण गृहित धरले जाणार असणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात अधिक उपस्थिती असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही काही महाविद्यालयांना या आदेशासंदर्भात स्पष्टोक्ती नसल्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे