मुंबई: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विजांचा गडगडाट, वादळ, गारपीट अशा वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे त्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. असा राज्यासह ऊन पावसाचा खेळ सुरू असताना हवामान खात्याने आणखी मोठी घोषणा केली आहे.
मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलं आहे. आजपासून पुढील चार दिवस म्हणजे १२ ते १८ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ५०-६० किमी प्रतितास वेग पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा व हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजनुसार शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ असणार आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 °C आणि 27 °C च्या आसपास असेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…