KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

  45

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा सामना पावसामुळे १६-१६ षटकाचा रंगला. केकेआरसाठी सुनील नरेन बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मात्र बॉलिंगदरम्यान त्याने एक विकेट घेतली.


सुनील नरेनने या सामन्यात एक खास यश मिळवले. तो एका हंगामात ४००हून अधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला.


नरेनने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४६१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले. नरेनची सर्वोत्कृष्ट कामगिरी १०९ धावा इतकी आहे. त्याने बॉलिंगमध्येही कमाल करताना १५ विकेट मिळवल्या. या दरम्यान २२ धावांत २ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. त्याच्या आधी जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनने ही कामगिरी केली आहे.


वॉटसनने राजस्थान रॉयल्ससाठी २००८मध्ये खेळताना ४७२ धावा केल्या होत्या. सोबतच १७ विकेटही मिळवल्या होत्या. कॅलिसने कोलकातासाठी २०१२मध्ये खेळताना ४०९ धावा केल्या होत्या. सोबतच १५ विकेटही मिळवल्या होत्या.


दरम्यान, शनिवारचा सामना पावसामुळे प्रभावित झाला. यामुळे सामना १६ षटकांचा करावा लागला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. या दरम्यान वेंकटेश अय्यरने २१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. रमणदीप सिंहने ८ बॉलमध्ये नाबाद १७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला १३९ धावाच करता आल्या. इशान किशनने २२ बॉलमध्ये ४० धावा केल्या. रोहित १९ धावा करून बाद झाला. हार्दिकने २ धावा केल्या.


Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार