KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा सामना पावसामुळे १६-१६ षटकाचा रंगला. केकेआरसाठी सुनील नरेन बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मात्र बॉलिंगदरम्यान त्याने एक विकेट घेतली.


सुनील नरेनने या सामन्यात एक खास यश मिळवले. तो एका हंगामात ४००हून अधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला.


नरेनने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४६१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले. नरेनची सर्वोत्कृष्ट कामगिरी १०९ धावा इतकी आहे. त्याने बॉलिंगमध्येही कमाल करताना १५ विकेट मिळवल्या. या दरम्यान २२ धावांत २ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. त्याच्या आधी जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनने ही कामगिरी केली आहे.


वॉटसनने राजस्थान रॉयल्ससाठी २००८मध्ये खेळताना ४७२ धावा केल्या होत्या. सोबतच १७ विकेटही मिळवल्या होत्या. कॅलिसने कोलकातासाठी २०१२मध्ये खेळताना ४०९ धावा केल्या होत्या. सोबतच १५ विकेटही मिळवल्या होत्या.


दरम्यान, शनिवारचा सामना पावसामुळे प्रभावित झाला. यामुळे सामना १६ षटकांचा करावा लागला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. या दरम्यान वेंकटेश अय्यरने २१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. रमणदीप सिंहने ८ बॉलमध्ये नाबाद १७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला १३९ धावाच करता आल्या. इशान किशनने २२ बॉलमध्ये ४० धावा केल्या. रोहित १९ धावा करून बाद झाला. हार्दिकने २ धावा केल्या.


Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख