KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

  49

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा सामना पावसामुळे १६-१६ षटकाचा रंगला. केकेआरसाठी सुनील नरेन बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मात्र बॉलिंगदरम्यान त्याने एक विकेट घेतली.


सुनील नरेनने या सामन्यात एक खास यश मिळवले. तो एका हंगामात ४००हून अधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला.


नरेनने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४६१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले. नरेनची सर्वोत्कृष्ट कामगिरी १०९ धावा इतकी आहे. त्याने बॉलिंगमध्येही कमाल करताना १५ विकेट मिळवल्या. या दरम्यान २२ धावांत २ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. त्याच्या आधी जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनने ही कामगिरी केली आहे.


वॉटसनने राजस्थान रॉयल्ससाठी २००८मध्ये खेळताना ४७२ धावा केल्या होत्या. सोबतच १७ विकेटही मिळवल्या होत्या. कॅलिसने कोलकातासाठी २०१२मध्ये खेळताना ४०९ धावा केल्या होत्या. सोबतच १५ विकेटही मिळवल्या होत्या.


दरम्यान, शनिवारचा सामना पावसामुळे प्रभावित झाला. यामुळे सामना १६ षटकांचा करावा लागला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. या दरम्यान वेंकटेश अय्यरने २१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. रमणदीप सिंहने ८ बॉलमध्ये नाबाद १७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला १३९ धावाच करता आल्या. इशान किशनने २२ बॉलमध्ये ४० धावा केल्या. रोहित १९ धावा करून बाद झाला. हार्दिकने २ धावा केल्या.


Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे