KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

  47

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा सामना पावसामुळे १६-१६ षटकाचा रंगला. केकेआरसाठी सुनील नरेन बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मात्र बॉलिंगदरम्यान त्याने एक विकेट घेतली.


सुनील नरेनने या सामन्यात एक खास यश मिळवले. तो एका हंगामात ४००हून अधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला.


नरेनने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४६१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले. नरेनची सर्वोत्कृष्ट कामगिरी १०९ धावा इतकी आहे. त्याने बॉलिंगमध्येही कमाल करताना १५ विकेट मिळवल्या. या दरम्यान २२ धावांत २ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. त्याच्या आधी जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनने ही कामगिरी केली आहे.


वॉटसनने राजस्थान रॉयल्ससाठी २००८मध्ये खेळताना ४७२ धावा केल्या होत्या. सोबतच १७ विकेटही मिळवल्या होत्या. कॅलिसने कोलकातासाठी २०१२मध्ये खेळताना ४०९ धावा केल्या होत्या. सोबतच १५ विकेटही मिळवल्या होत्या.


दरम्यान, शनिवारचा सामना पावसामुळे प्रभावित झाला. यामुळे सामना १६ षटकांचा करावा लागला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. या दरम्यान वेंकटेश अय्यरने २१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. रमणदीप सिंहने ८ बॉलमध्ये नाबाद १७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला १३९ धावाच करता आल्या. इशान किशनने २२ बॉलमध्ये ४० धावा केल्या. रोहित १९ धावा करून बाद झाला. हार्दिकने २ धावा केल्या.


Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र