CSK vs RR : चेपॉकमध्ये चेन्नईने राजस्थानला धुतले, प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले

Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील ६१व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनी हरवले. १२ मेला रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला विजयासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते.

चेन्नईने हे आव्हान १८.२ षटकांत पूर्ण केले. सीएसकेनचा या हंगामातील १३व्या सामन्यातील सातवा विजय आहे. ते पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा १२व्या सामन्यातील चौथा पराभव आहे.

चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४१ बॉलमध्ये ४२ धावांची नाबाद खेळी केली. यात दोन षटकारांसोबत एका चौकाराचा समावेश आहे. ऋतुराज चेपॉकच्या स्लो पिचवर शेवटपर्यंत टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. सलामीवीर रचिन रवींद्रनेही दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १८ बॉलमध्ये २७ धावा केल्या. राजस्थानसाठी आर अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नांद्रे बर्गर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

रियान आणि जुरेल यांची जबरदस्त खेळी

टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ५ बाद १४१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी रियान परागने ३५ बॉलमध्ये नाबाद ४७ धावांची खेळी केली. रियानने आपल्या खेळीत तीन षटकारांशिवाय एक चौकार लगावला. ध्रुव जुरेलने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १८ बॉलमध्ये २८ धावांची खेळी केली. सीएसकेसाठी सिमरजीत सिंहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

53 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

58 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago