Crime : मातृदिनी सासू-सुनेच्या नात्याला काळीमा! मुलाच्या मदतीने केली सुनेची निर्घृण हत्या

सासूने पकडले पाय तर पतीने दाबला गळा


नवी दिल्ली : आज जगभरात आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृदिन साजरा केला जात आहे. याच आईचे दुसरे रुप म्हणजे सासू. पण सासू-सुनेच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटी परिसरात समोर आली आहे. यामध्ये सासूने आपल्या मुलाचीही मदत घेत सुनेचा गळा दाबून तिला पाण्याच्या टाकीत फेकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटी परिसरातील एका कुटुंबामधील सासरच्यांनी त्यांच्या सुनेची घृणास्पद हत्या केल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासू व नवऱ्याने स्वत:च्या बायकोची हत्या केली असल्याचा खुलासा नोएडा पोलिसांकडून करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून सासू आणि सूनेमध्ये वाद झाला होता. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि सासू आणि पतीने मिळून महिलेची हत्या केली. गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटीतील स्टाफ क्वार्टरमधील पाण्याच्या टाकीत नोएडा पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं असून महिलेची हत्या तिचा पती कपिल आणि सासू सुमित्रा यांनी केल्याचे उघड झाले.



सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा


ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुमित्रा यांनी पूनमचे ​​पाय धरले होते, तर पती कपिलने तिचा गळा दाबला होता, असे चौकशीदरम्यान सांगत पूनमची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पूनम आणि तिची सासू सुमित्रा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. कपिलही या भांडणात सामील झाला होता. नंतर हे भांडण टोकाला पोहोचलं, यावेळी कपिलने पूनमला धक्का दिला, ज्यामुळे ती खाली पडली. यानंतर सासू सुमित्राने पूनमचे ​​पाय धरले आणि पती कपिलने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.


दरम्यान, पूनमच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह स्टाफ क्वार्टरमधील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत टाकून आई आणि मुलगा दोघांनी पळ काढला. मॅन्युअल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्विलंसच्या मदतीने आरोपी कपिल आणि सुमित्रा या दोघांना जिम्स तिराहा येथून नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय