Allu Arjun : आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अल्लु अर्जुनवर गुन्हा दाखल!

लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी हजारो चाहते गोळा झाले आणि... नेमकं काय घडलं?


हैदराबाद : दाक्षिणात्यच नव्हे तर अख्ख्या भारतात सुपरस्टार अल्लु अर्जुनचे (Allu Arjun) असंख्य चाहते आहेत. त्याच्या 'पुष्पा २' (Pushpa 2) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा लूक, स्टाईल, अॅक्शन या सगळ्यानेच प्रेक्षक भारावून गेले आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. मात्र, हेच आता अल्लुला महागात पडलं आहे. आंध्र प्रदेशात अल्लुवर आचारसंहितेचं उल्लंघन (Violation of Code of Conduct) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं...


अल्लु अर्जुन ११ मे रोजी आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे त्याचे मित्र आणि YSRCP चे आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या घरी पोहोचला. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना तो रेड्डी यांच्या घरी आल्याचं कळालं, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांनी रेड्डी यांच्या घराबाहेर गर्दी केली. पण यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचे मित्र आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला.


याचं कारण असं की, YSRCP चे आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी उर्फ शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे पुन्हा निवडणूक लढत आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जुनने रेड्डी यांच्या घरी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावली. अशातच रेड्डी यांच्या घराबाहेर अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. अल्लू अर्जुन घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना बघत होता. यावेळी लोक 'पुष्पा-पुष्पा' अशा घोषणा देत होते.



का केला गुन्हा दाखल?


शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होईल हे जाणून आरओ नंद्याल यांच्या परवानगीशिवाय अल्लू अर्जुनला घरी बोलावले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या दोघांवर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अल्लुचे आभार मानण्यासाठी रेड्डी यांचं ट्वीट


"माझा मित्र अल्लू अर्जुन, तू निवडणुकीसाठी मला शुभेच्छा देण्यासाठी नंद्यालपर्यंत प्रवास केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझा पाठिंबा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि आमच्या मैत्रीबद्दल मी खूप कृतज्ञ आहे!", असं ट्वीट आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी यांनी केलं.

Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,