Kareena Kapoor Khan : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस!

सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?


भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानला (Kareena Kapoor Khan) मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. या नोटीसला सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करीना कपूरने तिच्या गरोदरपणाच्या अनुभवावर छापलेल्या एका पुस्तकाचं शीर्षक वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. त्याचसंबंधी ही नोटीस करीनाला बजावण्यात आली आहे.


करीना कपूरने २०२१ मध्ये 'करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल' (Kareena Kapoor Khan Pregnancy Bible) हे तिचे पुस्तक लॉन्च केले होते. या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये 'बायबल' हा शब्द वापरल्याने तिने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरविरोधात जबलपूरच्या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटलं की, करीनाने ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत कारण 'पवित्र ग्रंथ बायबल'ची तुलना करीनाच्या गर्भधारणेशी होऊ शकत नाही. पण पोलिसांनी करीनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.


त्यानंतर ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन खासगी तक्रार दाखल केली. पण 'बायबल' या शब्दाचा वापर करुन करीनानं ख्रिश्चन समाजाच्या भावना कशा दुखावल्या गेल्या? हे सिद्ध करण्यात ख्रिस्तोफर अयशस्वी ठरल्याने दंडाधिकारी न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली. यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली असता तेथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. अशा परिस्थितीत आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरनं तिच्या 'करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल' या पुस्तकात 'बायबल' हा शब्द वापरून ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. करीना कपूरविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणी आता उच्च न्यायालयाने करीना कपूरला नोटीस बजावली असून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे