भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानला (Kareena Kapoor Khan) मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. या नोटीसला सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करीना कपूरने तिच्या गरोदरपणाच्या अनुभवावर छापलेल्या एका पुस्तकाचं शीर्षक वादाच्या भोवर्यात सापडलं आहे. त्याचसंबंधी ही नोटीस करीनाला बजावण्यात आली आहे.
करीना कपूरने २०२१ मध्ये ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ (Kareena Kapoor Khan Pregnancy Bible) हे तिचे पुस्तक लॉन्च केले होते. या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये ‘बायबल’ हा शब्द वापरल्याने तिने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरविरोधात जबलपूरच्या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटलं की, करीनाने ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत कारण ‘पवित्र ग्रंथ बायबल’ची तुलना करीनाच्या गर्भधारणेशी होऊ शकत नाही. पण पोलिसांनी करीनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.
त्यानंतर ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन खासगी तक्रार दाखल केली. पण ‘बायबल’ या शब्दाचा वापर करुन करीनानं ख्रिश्चन समाजाच्या भावना कशा दुखावल्या गेल्या? हे सिद्ध करण्यात ख्रिस्तोफर अयशस्वी ठरल्याने दंडाधिकारी न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली. यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली असता तेथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. अशा परिस्थितीत आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरनं तिच्या ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकात ‘बायबल’ हा शब्द वापरून ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. करीना कपूरविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणी आता उच्च न्यायालयाने करीना कपूरला नोटीस बजावली असून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…