IPL 2024: कोहलीच्या जोरावर RCB प्लेऑफसच्या शर्यतीत, जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका वेळेसाठी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या १०व्या स्थानावर होते. त्यावेळी आरसीबीच्या चाहत्यांनी प्लेऑफमध्ये खेळण्याच्या आशाच गमावल्या होत्या. मात्र विराट कोहलीने आपल्या दमदार खेळाडूने चेहराच बदलला.


आरसीबीने सलग ४ सामने जिंकत स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा आणले. इतकंच नव्हे तर त्यांनी चेन्नई सुपरकिंग्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा खेळही खराब केला. जाणून घ्या आयपीएलच्या प्लेऑफचे समीकरण


त्याआधी पॉईंट्स टेबलची स्थिती समजून घेणे गरजेचे असते. पंजाब किंग्सवर शानदार विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १० पॉईंट्स आहेत तसेच त्यांचा रनरेटही ०.२१७ इतका आहे. दिल्ली आणि लखनऊपेक्षा हा रनरेट चांगला आहे.


चेन्नई, दिल्ली आणि लखनऊचे संघ १२-१२ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पहिल्या तीन स्थानांवर कोलकाता नाईटरायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आहेत.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने आरसीबीने जिंकायलाच हवेत जर असे झाले तर त्यांचे १४ गुण होतील.


बंगळुरूचा पहिला सामना १२ मेला दिल्ली कॅपिटल्स आणि १८ मेला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आहे. आरसीबीसाठी हे दोन्ही सामने करो वा मरो आहेत. जर त्यांनी दिल्ली हरवले तर दोन्ही संघ बरोबरी गाठतील. मात्र आरसीबी चांगल्या रनरेटमुळे दिल्लीच्या पुढे जाईल.


आरसीबीच्या प्लेऑफच्या शर्यतीतील सर्वात मोठा अडथळा चेन्नई सुपर किंग्सचा आहे. त्यांचे १२ गुण आहे आणि रनरेटही चांगला आहे. त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. दरम्यान, चेन्नईने जर त्यांचे तीनही सामने हरले अथवा दोन सामने मोठ्या अंतराने हरले तरच आरसीबीचा प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता वाढू शकते.



लखनऊ सुपरजायंट्स


लखनऊ सुपरजायंट्सचे १२ सामन्यात १२ अंक आहेत ते जर दोन्ही सामने जिंकले तर आरसीबीच्या आशा संपुष्टात येतील . मात्र लखनऊचा संघ एक सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होतील. त्यांचा रनरेट खूप खराब आहे. जर दोन किंवा अधिक संघाचे १४-१४ गुण झाले तर लखनऊ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाणे निश्चित आहे.



लखनऊ-दिल्ली सामना निर्णायक


लखनऊ आणि दिल्ली यांच्यात १४ मेला होणारा सामना निर्णायक असेल. यातील जो संघ जिंकेल त्यांचे १४ गुण होतील. आरसीबीच्या नजरेने पाहिल्यास लखनऊ आणि दिल्लीला एक सामना हbangalरणे गरजेचे आहे. कारण कोणताही संघ जर दोन सामने जिंकला तर त्यांचे १६ गुण होतील आणि आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.