Jalana Voting : मतदानापूर्वीच जालन्यात शेकडो मतदानपत्रांचा कचरा!

व्हिडीओ होतोय व्हायरल; नेमकं प्रकरण काय?


जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या जोरदार प्रचार आणि मतदान (Voting) देखील सुरु आहे. राज्यात तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान, मतदानावेळी काही अनुचित प्रकारही घडले. काही ठिकाणी हाणामारी, तर काही ठिकाणी चक्क ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न झाला. काही ठिकाणी बोगस मतदानाचाही प्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता जालन्यात (Jalana) मतदानापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात बेवारस मतदान पत्रे (Voting cards) चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.


शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल १७६ मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली. याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





नेमकं काय घडलं?


नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना काल सकाळी मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आली. याबाबत, त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला.


कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा पुढील तपास सुरू केला आहे. सापडलेल्या ओळखपत्रांच्या नावांची बीएलओमार्फत तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. मात्र, मतदानापूर्वीच येथे अशाप्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन