विराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४साठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचा शुभारंभ अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळेल. या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी विराट कोहलीने सलामीला उतरले पाहिजे. असा सल्ला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने दिला आहे.


सौरव गांगुलीने सांगितले की, विराट खरच कमालीचा खेळ करत आहे. गेल्या रात्री विराटने जी फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. त्याने लवकरात लवकर ९० धावा केल्या. आपल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याला सलामीला उतरवले पाहिजे. हे त्याने आपल्या गेल्या काही खेळीतून दाखवले आहे. भारताचा संघ चांगला आहे. बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्येही ते शानदार खेळ करत आहेत.


गांगुलीने याआधीही म्हटले होते की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फायनलचा सामना रंगेल. गांगुलीने म्हटले होते की या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन चांगले संघ आहेत. मी नक्की आहे की हे दोन्ही संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये २०२३मधील कामगिरी करतील. भारताचा संघ चांगला आहे. सर्व मॅचविनर खेळाडू आहेत. मला माहीत आहे की रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने बेस्ट १५ खेळाडूंना निवडले आहे.


Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र