विराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४साठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचा शुभारंभ अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळेल. या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी विराट कोहलीने सलामीला उतरले पाहिजे. असा सल्ला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने दिला आहे.


सौरव गांगुलीने सांगितले की, विराट खरच कमालीचा खेळ करत आहे. गेल्या रात्री विराटने जी फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. त्याने लवकरात लवकर ९० धावा केल्या. आपल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याला सलामीला उतरवले पाहिजे. हे त्याने आपल्या गेल्या काही खेळीतून दाखवले आहे. भारताचा संघ चांगला आहे. बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्येही ते शानदार खेळ करत आहेत.


गांगुलीने याआधीही म्हटले होते की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फायनलचा सामना रंगेल. गांगुलीने म्हटले होते की या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन चांगले संघ आहेत. मी नक्की आहे की हे दोन्ही संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये २०२३मधील कामगिरी करतील. भारताचा संघ चांगला आहे. सर्व मॅचविनर खेळाडू आहेत. मला माहीत आहे की रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने बेस्ट १५ खेळाडूंना निवडले आहे.


Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे