विराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४साठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचा शुभारंभ अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळेल. या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी विराट कोहलीने सलामीला उतरले पाहिजे. असा सल्ला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने दिला आहे.


सौरव गांगुलीने सांगितले की, विराट खरच कमालीचा खेळ करत आहे. गेल्या रात्री विराटने जी फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. त्याने लवकरात लवकर ९० धावा केल्या. आपल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याला सलामीला उतरवले पाहिजे. हे त्याने आपल्या गेल्या काही खेळीतून दाखवले आहे. भारताचा संघ चांगला आहे. बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्येही ते शानदार खेळ करत आहेत.


गांगुलीने याआधीही म्हटले होते की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फायनलचा सामना रंगेल. गांगुलीने म्हटले होते की या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन चांगले संघ आहेत. मी नक्की आहे की हे दोन्ही संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये २०२३मधील कामगिरी करतील. भारताचा संघ चांगला आहे. सर्व मॅचविनर खेळाडू आहेत. मला माहीत आहे की रोहित शर्मा आणि राहुल द्रविडने बेस्ट १५ खेळाडूंना निवडले आहे.


Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात