Border 2 Movie : तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसणार 'बॉर्डर'वरील संघर्ष!

  86

सनी देओलसह 'हा' अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत


मुंबई : 'बॉर्डर' (Border movie) या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय जवानांच्या संघर्षावर आधारलेल्या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला होता. मल्टी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना भावूक करत त्यांची मने जिंकली होती. यातील 'संदेसे आते है' (Sandese aate hain) या गाण्याने आजही भारतीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या दुसर्‍या भागाची (Border 2) घोषणा करण्यात आली असून पुढील वर्षात २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


'बॉर्डर २' या चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा गौरव करणारा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. त्यानुसार २६ जानेवारीपूर्वी २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं आहे.


सनी देओलसोबत (Sunny Deol) आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खास भूमिका साकारणार आहे. बॉर्डर २ चे दिग्दर्शन अनुराग सिंग (Anurag Singh) करणार आहेत. त्यांनी अक्षय कुमारच्या 'केसरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.



आजवरचा सर्वात मोठा युद्धपट


या चित्रपटाच्या कथेवर जवळपास वर्षभरापासून काम सुरू आहे, असं म्हटलं जात आहे. ‘बॉर्डर पार्ट १’ सारखा हाही ब्लॉकबस्टर चित्रपट व्हावा, या दृष्टीकोनातून चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. मागच्या महिन्यात या चित्रपटाच्या कथेसंदर्भात माहिती समोर आली होती. यावेळी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या युद्धाची कथा दाखवण्यात येणार आहे. राजस्थानमधील थारच्या लोंगेवाला भारतीय चौकीवर ही लढाई झाली होती. हा आजवरचा सर्वात मोठा युद्धपट ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके